Home Uncategorized पुण्यात मुसळधार पाऊस.- बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस.- इमारती खचल्या, कालवा फुटला.- कार...

पुण्यात मुसळधार पाऊस.- बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस.- इमारती खचल्या, कालवा फुटला.- कार गेली वाहून🟥कोरोनाचा धोका वाढतोय.- मुंबईत २४ तासांत कोरोनाचे ३५ नवे रुग्ण.🛑राज्यात पावसाचा हाहाकार.- नद्यांना पूर, रस्ते पाण्याखाली.☔🌧️☔मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग.- मध्य रेल्वेला फटका.- नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

Oplus_131072

🟥पुण्यात मुसळधार पाऊस.- बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस.- इमारती खचल्या, कालवा फुटला.- कार गेली वाहून
🟥कोरोनाचा धोका वाढतोय.- मुंबईत २४ तासांत कोरोनाचे ३५ नवे रुग्ण.
🛑राज्यात पावसाचा हाहाकार.- नद्यांना पूर, रस्ते पाण्याखाली.
☔🌧️☔मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग.- मध्य रेल्वेला फटका.- नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

🟥पुण्यात मुसळधार पाऊस.- बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस.- इमारती खचल्या, कालवा फुटला.- कार गेली वाहून

पुणे :- प्रतिनिधी

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहा:कार बघायला मिळत आहे. पुण्यात दौंड, बारामती इथे तर तुफान पाऊस पडत आहे. बारामतीत ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याची माहिती मिळत आहे. यामुळे तीन इमारती खचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दौंडमधील एका गावात अनेक घरे हे पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यात दररोज पाऊस पडतोय. मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे शिवशाही बसवर बस स्थानकाचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप आलेली नाही.

पुण्याच्या दौंड तालुक्यात पावसाचं आक्राळविक्राळ रुप बघायला मिळालं. गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या गावात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पावसाच्या हाहा:काराने पुणे-सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा कार वाहून गेली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने वाहतूक ठप्प झालीय. याशिवाय स्वामी चिंचोली गावात अनेक घरं पाण्याखाली गेल्याची माहिती आता मिळत आहे.

🟥कोरोनाचा धोका वाढतोय.- मुंबईत २४ तासांत कोरोनाचे ३५ नवे रुग्ण.

मुंबई :- प्रतिनिधी.

सध्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. २३ मे रोजी राज्यात ४५ नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी ३५ नवीन रुग्ण एकट्या मुंबईत आढळले. सध्या मुंबईत एकूण संक्रमितांची संख्या १८५ वर पोहोचली आहे आणि आज देखील त्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यापासून मुंबईत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) लोकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. म्हणून, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच, जर कोणाला कोरोनाची लक्षणे आढळली तर ताबडतोब चाचणी करून घ्या आणि वेळेवर उपचार घ्या. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

महापालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १९ कोविड रुग्ण आहेत, त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर रुग्णांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत, त्यामुळे त्या सर्वांना होम क्वारंटाइनमध्ये राहून उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांच्या अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत. यासोबतच, महापालिकेच्या आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांनाही रुग्णांच्या अँटीजेन चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.

🟥राज्यात पावसाचा हाहाकार.- नद्यांना पूर, रस्ते पाण्याखाली.- शेतीचे अतोनात नुकसान तर पुणे जिल्ह्यात ढगफुटी सदृश्यस्थिती

मुंबई :- प्रतिनिधी

राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा तसेच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. पुणे जिल्हातील काही भागांत पाणी साचलं असून दौड तालुक्यातील कुरकंभ येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पुणे -सोलापूर महामार्गावरील पाटस येथे ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झालेलं आहे. तसेच बीड आणि संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांमधील संपर्क तुटला आहे. तर सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला आहे.

🟥साताऱ्यात पावसाचा हाहाकार

साताऱ्यात पावसाने थैमान घातलं आहे. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे धुमाळवाडी गावाचा एकूण 35 गावांशी संपर्क तुटला आहे. फळांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीवर मुसळधार पावसाचे संकट ओढावले आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात पाऊस थांबायचं नाव घेत नाही. यामुळे कोयना धरणातील पाणी हे ओव्हफ्लो झाले आहे.

🔴पुणे जिल्ह्यात ढगसदृश्यस्थिती

साताऱ्यानंतर पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दौंड तालुक्यातील पाटसमध्ये ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. तर कुरकुंभमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे. तसेच या पावसामुळे काही छोटे पूल हे पाण्याखाली गेले आहेत. तसेच वाहत्या पाण्यामध्ये एक कार वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

🟥पालघरमध्येही पावसाचं थैमान

पालघरमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस थांबायचं नाव घेत नाही. आज दिवसभर पावसाने पालघर जिल्ह्यामध्ये दमदार बॅटिंग केली आहे. यामुळे पालघरमध्ये काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पालघर जिल्ह्यात सर्वाधिक वीट भट्टींचे प्रमाण आहे. मात्र, या मान्सूनने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पळवला आहे. त्यामुळे केवळ पालघरच नाहीतर राज्यातील बळीराजा सध्या चिंतेत आहे.

💥बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यांचा संपर्क तुटला.

गेल्या आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाने बीडमधील पर्यटनस्थळ असणाऱ्या कपिलधारा धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहू लागला. दरम्यान, मुसळधार पावसाने बीड आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जोडल्या जाणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरु होते. मात्र, बांधकाम सुरु असणारा पूल कोसळल्याने आता नागरिकांना दहा किमी अंतर अधिकचा प्रवास करावा लागणार आहे. यामुळे बीड आणि छत्रपती संभाजीनगरचा संपर्क तुटल्याचं बोललं जात आहे.

🟥जनावरांचा गोठा गेला उडून

वाशीममध्ये पिंपळगावातील एका शेतकऱ्याच्या जनावरांचा कोठाच उडून गेला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. जनावरांसाठी साठवण्यात आलेला चारा पावसामुळे भिजून गेला आहे. काही शेतकऱ्यांचे गोठे कोसळल्याने जनावरांनाही दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिन्नर बसस्थानकाचा स्लॅब कोसळला

तर कोकणातील सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झालं आहे. काही भागांमध्ये पावसाचे पाणी साठून पाण्याचे लोट वाहू लागले आहे. तसेच सिन्नर स्थानकाचा सहा नंबर प्लॅटफॉर्मचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला आहे. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. खबरदारी म्हणून बसस्थानक रिकामं करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आले असून या घटनेमुळे सिन्नर शहरातील काही रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

☔🌧️☔मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग.- मध्य रेल्वेला फटका.- नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

मुंबई :- प्रतिनिधी.

मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतून १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे.

पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. भांडूप, घाटकोपर, ठाण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस पडतआहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

🟥त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ज्या सूखसरींची राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते तो मान्सून यंदा १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मे महिन्यातच राज्यात मान्सून येण्याची ही १६ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये मान्सून रविवारी चक्क तळकोकणात पोहोचला आहे. कर्नाटक आणि संपूर्ण गोवा राज्यातही त्याने धडक दिली. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.