Homeकोंकण - ठाणेआजरा शहर व उपनगरातील घरगुती पाणी पुरवठा व नवीन पाणी पुरवठा योजनेचे...

आजरा शहर व उपनगरातील घरगुती पाणी पुरवठा व नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामाबाबत.- समितीचे निवेदन.🟥वळवाच्या पावसात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू ! वीज अटकाव यंत्राचे व्यस्त प्रमाण!!🛑बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन.- पत्रकार बैठकीत माहिती.- प्रश्न वन्य प्राण्यांचा

🛑आजरा शहर व उपनगरातील घरगुती पाणी पुरवठा व नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामाबाबत.- समितीचे निवेदन.
🟥वळवाच्या पावसात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू ! वीज अटकाव यंत्राचे व्यस्त प्रमाण!!
🛑बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन.- पत्रकार बैठकीत माहिती.- प्रश्न वन्य प्राण्यांचा.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतीमार्फत सुरळीत पाणी पुरवठा होणेबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीतर्फे कायम पाठपुरावा करुन सुध्दा नियमित पाणी पुरवठा होत नसलेची निवेदन दिले आहे दिलेल्या नियोजनात म्हटले आहे.
सोमवारपेठ आजरा येथील सुमेध वालावलकर यांचे परित्तरातील बऱ्याच घरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत सुमेध वालावलकर यांनी वारंवार सुचना देऊन सुध्दा दुरुस्ती करणेचे काम चालु आहे. उद्या योग्य दाबाने पाणी पुरवठा होईल असे सांगितले जात आहे. परंतु आजतागायत याठिकाणी योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही.
तसेच गोठण गल्ली, आजरा येथील बंडा चव्हाण यांच्या घराशेजारील परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. गेली तीन महिने पुरेसे पाणी मिळत नसलेने स्वखर्चाने टैंकर मागवून पाणी घेत आहेत. नियमित योग्य दाबाने पाणी पुरवठा करणे बाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीतर्फे दिनांक ११/०३/२०२५ रोजी मोर्चा काढणेत येणार असलेचे सूचित केले नंतर दिनांक १०/०३/२०२५ पासून योग्य दाबाने पाणी पुरवठा करतो असे सांगून सदर मोर्चा रद्द करणेचे षडयंत्र रचले होते, त्या व्यक्तीनी पुढे येऊन सद्या नियमित पाणी पुरवठा करणेची जबाबदारी घेणे जरूरीचे आहे.
आजरा शहरातील व उपनगरातील बऱ्याच भागात नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम झाले असलेने रस्ते खराब झालेले आहेत त्याठिकाणी नवीन रस्त्याची कामे करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे कामे चालु आहेत, परंतु ज्याठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेची पाईप टाकून व कनेक्शन देऊन योग्य दाबाने पाणी पुरवठा होत आहे याची खात्री करुनच रस्त्याची कामे चालु करावीत. नवीन कनेक्शन अथवा दुरुस्तीसाठी लागलीच नवीन केलेला रस्ता उकरावा लागू नये, शासनाचे पैसे वाया जाणार नाहीत व रहिवास्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
नगरपंचायतीचा विद्युत खर्च कमी व्हावा यादृष्टीने शासनाकडून सौर उर्जा पॅनेल बसवण्यासाठी योग्य निधी देण्यात आला आहे. परंतु सदर सोलर सिस्टीम अद्याप का कार्यान्वीत करणेत आला नाही याचा खुलासा जनतेसमोर सादर करावा.
नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम दिनांक २०/०४/२०२५ रोजी पुर्ण होऊन लगेच कार्यान्वीत होईल असे आपण वारंवार सांगत आला आहात व तसे लेखी सुध्दा दिलेले आहे परंतु आपण दिलेल्या मुदतीनंतर एक महिना उलटला असूनही अजुन बऱ्याच भागात अद्याप पाईप टाकणे व कनेक्शन देणे बाकी आहे. तेंव्हा सदर योजना केव्हा कार्यान्वीत होणार व ठेकेदारावर केलेल्या कारवाईची माहिती जनतेसमोर देणेत यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, बंडोपंत चव्हाण, संजय जोशी, मिनीन डिसोझा, जोतिबा आजगेकर उपाध्यक्ष, सुमेध वालावलकर सह सर्व सदस्यांच्या सह्या आहेत.‌

🟥वळवाच्या पावसात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू ! वीज अटकाव यंत्राचे व्यस्त प्रमाण!!

छत्रपती संभाजीनगर :- प्रतिनिधी

वळवाच्या पावसामुळे मराठवाड्यात आतापर्यंत २७ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ३९२ जनावरे दगावली आहेत. मराठवाड्यात वीज पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने वीज अटकाव करणारी यंत्रे वाढवावीत, अशा सूचना मान्सूनपूर्व बैठकीत करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात ५०३ वीज अटकाव यंत्रे आहेत. त्यातील सर्वाधिक ३०८ एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. आतापर्यंत मृत व्यक्तींची संख्याही बीडमध्येच सर्वाधिक आहे.

अन्य सात जिल्ह्यांत १९५ वीज यंत्रे आहेत.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सोमवारी घेतलेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ७५, जालना व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी चार एवढीच वीज अटकाव यंत्रे आहेत.यातील परभणी जिल्ह्यातील सर्व यंत्रे नादुरुस्त अवस्थेत असल्याची माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून मराठवाड्यात पावसामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून, मे महिन्यात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. एका वीज अटकाव यंत्राची किंमत पाच हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. जर वीज पडून मृत्यू कमी करायचे असतील, तर ही यंत्रे वाढवावी लागतील, अशी मागणी केली जात आहे. याशिवाय ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ हे दोन ‘ॲप’ मोबाइलमध्ये घेतल्यास वीज पडू शकते की नाही, याचा अंदाज मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील १४ प्रमुख नद्यांवर आठ जिल्ह्यांतील ६५५ गावे पूरप्रवण असल्याने या गावांत कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. केवळ माॅन्सूनपूर्व आढावाच नाही, तर राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीमध्येही मराठवाड्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचा आढावा घेतला जात आहे. कोणतीही मालमत्ता तारण न घेता पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. पतमानांकन तपासू नये, अशा तोंडी सूचनांबरोबरच त्या बँकांना लेखी स्वरूपात द्याव्यात, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील प्रलंबित नुकसानभरपाई कंपन्यांनी द्यावी, तसेच रसायनिक खत वितरणातील दोष दूर करण्यासाठी राज्य सरकारने आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

💥खतपुरवठ्यात सुरळीतपणा हवा

बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा या तालुक्यांतील खत वितरणासाठी अहिल्यानगरहून आरक्षित साठा मिळावा. हा साठा अन्य कोणी तरी उचलतो. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव या तालुक्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हा थांबा आहे. मात्र, तेथून खते उपलब्ध होत नाहीत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यासाठी जालना येथून खतसाठा आरक्षित करण्याची गरज आहे. हे होत नसल्याने वाहतूक खर्च वाढतो, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. प्रकाश देशमुख यांनी व्यक्त केले.

🛑बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन.- पत्रकार बैठकीत माहिती.
( वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्या अतिशय गंभीर.)

वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्या अतिशय गंभीर आहेत. अनेकदा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मुळे शेतकऱ्यांचे मृत्यू देखील होत आहेत.

वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच्या काही उपाययोजना वनविभागाने तातडीने कराव्यात या मागणीसाठी ३० मे रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार बैठकीत देण्यात आली.

वन तळी म्हणजेच पाणी व जंगलातील चारा पुरेपूर उपलब्ध करणे, ज्या जंगलांमध्ये निलगिरी, अष्टम बाभळ, सागवान, बांबू लागवड केल्यामुळे चारा उगवत नाही. अशा जंगलांचे टप्प्याटप्प्याने विरळीकरण करून त्यामध्ये भारताच्या वातावरणाला अनुकूल असणारी देशी प्रजातीची झाडांची लागवड करणे, वनविभाग व शेतकऱ्यांच्या जमिनी याच्या हद्दीवर १० फूट खोल १० फूट रुंद व पुन्हा दहा फूट उंच अशी चर वनविभागाच्या हद्दीत मारली पाहिजे. व त्यानंतर जंगलाच्या शेतकऱ्याच्या हद्दीकडील बाजूस किमान आठ फूट उंचीचे सौर कुंपण असले पाहिजे जेणेकरून कोणताही वन्य प्राणी ते हद्द ओलांडून शेतकऱ्याच्या हद्दीत येणार नाही अथवा कोणताही थे ही हद्द ओलांडून वनविभागाच्या हद्दीत जाणार नाही. शेतकऱ्यांना income risk management inagriculture या कायद्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच सर्व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी अथवा मृत झालेल्या पीडित व्यक्तींना तात्काळ त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी, सद्य स्थितीत देण्यात येणारी नुकसान भरपाई अतिशय तोकडी असल्याने ती वाढवण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सदर आंदोलन होणार आहे.

ज्ञयावेळी बैठकीस डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे, अमित सुळेकर, शरद पाटील, किरण देसाई, जुल्फिकार शेख, तुकाराम कांबळे, शेखर कांबळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.