मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोण वरचढ? 🛑एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे.- मोठा खुलासा..पहा.👇👇
🛑शिक्षक मुख्यालयी राहतात का? – ३० नोव्हेंबरपर्यंत अहवाल पाठवा. – केंद्रप्रमुखांना शिक्षकांकडून माहिती भरून घेत ३० नोव्हेंबरपर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावी लागणार.
मुंबई :- प्रतिनिधी.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे अनेक गरजूंना मदत करण्यात येत असते. या मु्ख्यमंत्री सहाय्यता निधीत राज्याचा प्रत्येक मुख्यमंत्री सढळहस्ते मदत करीत असतो. मात्र आरटीआयमार्फत काढलेल्या माहीतीमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणगी जमा करण्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात अखडता घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत आजी मुख्यमंत्री यांनी कमी निधी जमा केल्याची माहीती उघडकीस आली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत चांगलाच निधी जमा केल्याचा खुलासा झाला आहे.

🅾️मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अनेक गरजूंना मदत केली जात असते. नैसर्गिक संकट असो वा वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी नेहमीच कामाला येत असतो. मुख्यमंत्री सचिवालयाकडे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी संबंधी माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सचिवालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी अनिल गलगली यांना ही माहीती कळविली. त्यानूसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी केवळ 65.88 कोटी जमा केले असल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम गेल्या 3 मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत कमी आहे.

🟥मुख्यमंत्री सचिवालयाकडे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सचिवालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी अनिल गलगली यांनी माहीती दिली. त्यानूसार 1 एप्रिल 2022 रोजीची शिल्लक रु 418.88 कोटी आणि 31मार्च 2023 रोजी शिल्लक रु 445 .22 कोटी आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी वर्षनिहाय प्राप्त देणग्याची माहिती 1 जानेवारी 2015 पासून ते 31 मार्च 2023 पर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर सर्वांत पिछाडीवर शिंदे आहेत.

🔴निधीत सर्वाधिक देणगी ठाकरे यांची
मुख्यमंत्री असताना 5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी 614 कोटींची वाढ केली तर 2 वर्षात उद्धव ठाकरे यांनी 793 कोटींची वाढ केली आहे. एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या एक वर्षात 65.88 कोटींची वाढ केली आहे.

🛑गरजूंना मदत करण्यात फडणवीस अव्वल
मागील 8 वर्षात तिनही मुख्यमंत्र्यांमध्ये गरजूंना मदत करण्यात देवेंद्र फडणवीस अव्वल आहेत. फडणवीस यांच्या कार्यकाळात 1 लाख 7 हजार 782 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 63 हजार 573 नागरिकांना 598.32 कोटींची मदत करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी 10 हजार 712 पैकी 4 हजार 247 नागरिकांना 20.28 कोटी रुपयांची मदत केली तर एकनाथ शिंदे यांनी 14 हजार 566 पैकी 7419 नागरिकांना 57 कोटींची मदत केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात हुशार आणि जबाबदार सनदी अधिका-यांची नेमणूक केल्यास निधीत वाढ होईल आणि पारदर्शकता राहील. लाभार्थीची यादी संपूर्ण तपशीलवार दिल्यास काही प्रमाणात होणारी बोगसगिरी थांबेल असे अनिल गलगली यांनी म्हटले आहे.
🛑शिक्षक मुख्यालयी राहतात का? – ३० नोव्हेंबरपर्यंत अहवाल पाठवा. – केंद्रप्रमुखांना शिक्षकांकडून माहिती भरून घेत ३० नोव्हेंबरपर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावी लागणार.
छत्रपती संभाजीनगर :- प्रतिनिधी.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रप्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार केंद्रप्रमुखांना शिक्षकांकडून माहिती भरून घेत ३० नोव्हेंबरपर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावी लागणार आहे. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या नव्या मोहिमेमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.


🟥जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी २० ऑक्टोबर रोजी कचनेर तांडा नंबर दाेन येथील प्राथमिक शाळेला सकाळी दहा वाजता भेट दिली होती. त्या शाळेच्या तपासणीत एकही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच भेटीदरम्यान गावच्या सरपंचांनी एकही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याची बाब सीईओंच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार सीईओंनी जि.प. शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत आहेत किंवा नाही, याबाबत खात्री करण्याचे आदेश दिले आहेत.

🔴या आदेशानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांना आदेश देत शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत पं.स. कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार शिक्षक मुख्यालयी राहत असल्याचे पुरावे २० ऑक्टोबर २०२३ नंतरचे असावेत, असेही स्पष्ट केले. भाजपचे गंगापूर विधानसभेचे आ. प्रशांत बंब यांनी दोन वर्षांपासून हा मुद्दा उचलून धरलेला आहे. ते सातत्याने शिक्षक मुख्यालयी राहण्याविषयीची मागणी लावून धरीत आहेत.

शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया:-
१) मुख्यालयी राहण्याची आमचीही इच्छा आहे. शासनाने मुख्यालयी राहण्यासाठी निवासाची व्यवस्था करून द्यावी, आम्ही त्या ठिकाणी आनंदाने राहण्यास तयार आहोत. मात्र, सुविधा उपलब्ध करून न देताच मुख्यालयी राहण्याचा आग्रह धरणे कितपत योग्य आहे?
विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
२) मुख्यालयी राहण्याचा नियम फक्त शिक्षकांनाच आहे का? हा नियम जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचाऱ्यांना आहे. त्याच्याविषयी लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाहीत. मात्र, शिक्षकांनाच टार्गेट केले जात आहे. मुख्यालयी राहण्याविषयीचा निर्णय एकदाच का सोडवला जात नाही. वारंवार तो विषय पुढे केला जात आहे. याविरोधात सर्व शिक्षक संघटना एकत्रितपणे लढा उभारतील.
दिलीप ढाकणे, संस्थापक अध्यक्ष, आदर्श शिक्षक समिती
३) पूर्वी खेडेगावात जाण्यासाठी साधने नव्हती. आता साधने उपलब्ध झाली आहेत. एकाच गोष्टीची चार-चारदा माहिती मागविणे चुकीचे आहे. शासनाने शिक्षकांसाठी घरे बांधून द्यावीत. शिक्षक त्याठिकाणी राहण्यास तयार आहेत. एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा, शासनाने त्या विषयीच्या गाइडलाइन जाहीर कराव्यात. मात्र, वारंवार शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करू नये.
दीपक पवार, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना

४) डिजिटल युग व प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात कालबाह्य झालेल्या शासन निर्णयाचा आधार घेत शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा अट्टाहास न उलगडणारा आहे. हा न्याय इतर कर्मचाऱ्यांनादेखील लावावा. वास्तविक पाहता शिक्षक शासनाने निर्धारित केलेल्या १० ते चार या विहित वेळेत शाळेत येतो का? अध्यापन करतो का, हे प्रशासनाने बघावे.
राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
५) सर्व शिक्षक हे मुख्यालयीच राहतात. जिल्ह्यात वाडी, तांडे यांची संख्या जास्त आहे. तेथील शिक्षक हे लगतच्या मोठ्या गावात राहतात. मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यापेक्षा विद्यार्थ्यांची गुणवत्ता महत्त्वाची आहे. अशैक्षणिक कामे बंद करून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ द्यावा, हे महत्त्वाचे आहे.
राजेश भुसारी, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती
