जिल्ह्यात 21 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून 3 हजार 28 क्युसेक विसर्ग.
कोल्हापूर. प्रतिनिधी.दि. 16
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.51 दलघमी पाणीसाठा असून
धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 6 खुला असून सध्या धरणातून 3 हजार 28 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण व वालोली, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड व सुळकुड, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव व तांदूळवाडी असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहे.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 233.51 दलघमी, तुळशी 97.77 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 667.95 दलघमी, कासारी 77.52 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी- 75.53, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98, पाटगाव, जंगमहट्टी, जांबरे, कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 25.10 फूट, सुर्वे 25.2 फूट, रुई 55.9 फूट, इचलकरंजी 53 फूट, तेरवाड 49.9 फूट, शिरोळ 43.9 फूट, नृसिंहवाडी 44 फूट, राजापूर 31.1 फूट तर नजिकच्या सांगली 18.6 फूट व अंकली 22.7 फूट अशी आहे.
गगनबावडा तालुक्यात काल 32.8 मिमी पाऊस.
[ जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 32.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –
हातकणंगले- 2.1 मिमी, शिरोळ – 0.4 मिमी, पन्हाळा- 15.9 मिमी, शाहूवाडी- 25.4 मिमी, राधानगरी- 12.8 मिमी, गगनबावडा- 32.8 मिमी, करवीर- 5.6 मिमी, कागल- 4.2 मिमी, गडहिंग्लज- 4.4 मिमी, भुदरगड- 16.1 मिमी, आजरा- 15.4 मिमी, चंदगड- 12.3 मिमी असा एकूण 10.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.]