Homeकोंकण - ठाणेमहापालिकेचं पथक नारायण राणेंच्या बंगल्याकडे निघालंनारायण राणे यांच्या बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली.

महापालिकेचं पथक नारायण राणेंच्या बंगल्याकडे निघालं
नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली.

महापालिकेचं पथक नारायण राणेंच्या बंगल्याकडे निघालं
नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली.

मुंबई :- प्रतिनिधी.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील अधीश या बंगल्याची मुंबई महानगरपालिकेकडून सोमवारी कारवाई होण्याची शक्यता आहे. काहीवेळापूर्वीच महापालिकेच्या आठ अधिकाऱ्यांचे पथक नारायण राणे यांच्या बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. नारायण राणे यांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वीच हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गेले होते. याठिकाणी या पथकाकडून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली. त्यामुळे महानगरपालिकेचे पथक आज नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाई करणार का, हे पाहावे लागेल. गेल्यावेळी पालिकेचे अधिकारी राणे यांच्या अधीश बंगल्यावर आले होते. परंतु, त्यावेळी कोणीही बंगल्यात नसल्याने पालिकेचे अधिकारी नोटीस चिकवटून परतले होते. मात्र, आज पालिकेचे अधिकारी पूर्ण तयारी करून आल्याची चर्चा आहे. याठिकाणी पालिका अधिकाऱ्यांकडून अनधिकृत बांधकामाबाबत तपासणी आणि मोजमाप होण्याची शक्यता आहे. सध्या नारायण राणे स्वत: जुहूतील बंगल्यावर आहेत. त्यामुळे पालिकेच्या पथकाने कारवाई केल्यास नारायण राणे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील चिवला बंगल्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले होते. त्यानंतर नारायण राणे यांचा जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. मुंबई महानगरपालिकेने नुकतीच या बंगल्याला नोटीस बजावली होती. पालिकेच्या नोटीसनंतर नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र आक्रमक झाले होते. नारायण राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता. तर नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते.
नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली
पालिकेचे अधिकारी बंगल्याचा पाहणी आणि मोजणी करणार

महानगरपालिकेच्या पथकात आठ अधिकाऱ्यांचा समावेश

पोहोचणाथोड्याच वेळात महानगरपालिकेचे पथक नारायण राणे यांच्या बंगल्यावर पोहोचणार
महापालिकेचे पथक पोलीस संरक्षणासाठी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात
चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर हातोडा?

शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या युद्धातील प्रमुख शिलेदार नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे यांच्या कोकणातील निलरत्न या बंगल्यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे हा आदेश राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून आला आहे. मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा निलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता नारायण राणे यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.