नवी दिल्ली:-वृत्तसंस्था.
व्हेरिएंटने आता जम्मू काश्मीरमध्येही शिरकाव केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये आज ओमिक्रॉनचे तीन रुग्ण आढळून आले. ओमिक्रॉनचे रुग्ण आढळलेलं देशातील हे चौदावं राज्य ठरलं आहे. दरम्यान, भारतातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता २२० वर पोहचली असून वाढता धोका लक्षात घेत केंद्र सरकारने सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क करणारं तातडीचं पत्र लिहिलं आहे.
देशात वाढत चालला आहे. या व्हेरिएंटचे भारतातील पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले होते. त्यानंतर एका महिन्याच्या आतच हा व्हेरिएंट १४ राज्यांत पसरला आहे. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये या व्हेरिएंटचे तीन रुग्ण आढळून आले. या तिघांचे नमुने एनसीडीसीकडे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असता तिघांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर संबंधित संपूर्ण विभागात आरटीपीसीआर चाचण्या घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेलंगणमध्ये आज ओमिक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळले. यापैकी तिघेजण ‘नॉन रिस्क’ देशांतून आलेले असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चौथा रुग्ण यातील एकाच्या संपर्कातील आहे. दुसरीकडे महाराष्ट्राची चिंता वाढत चालली आहे. महाराष्ट्रात आज आणखी ११ रुग्णांची भर पडली. यापैकी ८ रुग्ण विमानतळावरील तपासणीतील आहेत तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता ६५ वर पोहचली असून देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रानंतर दिल्लीतील रुग्णसंख्या ५४ वर पोहचली आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मंगळवारी तातडीचे पत्र लिहून सतर्क केले आहे. व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंट तीनपट अधिक वेगाने पसरतो. ही बाब लक्षात घेत स्थानिक पातळीवर आणि जिल्हा स्तरावर डेटा विश्लेषण, वेगवान निर्णय यासोबतच संसर्ग रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार पावले उचलली जावीत, असे स्पष्ट निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत. स्थितीवर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाइट कर्फ्यू , मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध, लग्नसोहळा आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितीवर मर्यादा, अशी पावले उचलली जावीत असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कार्यालये, कंपन्या, उद्योग, सार्वजनिक वाहतूक सेवा येथेही उपस्थिती कमी करण्याबाबत यात सूचित करण्यात आले आहे. स्थितीनुसार हा निर्णय घेतला जावा,असे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे.
