फोटोंनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जगावर आता ‘सुपर अल निनो’चे महाभयंकर संकट.
मुंबईः- प्रतिनिधी
जागतिक हवामानात अत्यंत वेगाने आणि चिंताजनक बदल होत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या सॅटेलाईट फोटोंनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जगावर आता ‘सुपर अल निनो’चे महाभयंकर संकट घोंघावू लागले आहे. भूमध्यरेखीय पॅसिफिक महासागराच्या काही भागांमध्ये समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली कमालीची वाढ हे याचे स्पष्ट संकेत आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘सेंटिनल-६ मायकल फ्रेलिच’ या अत्याधुनिक उपग्रहाने या धक्कादायक बदलांची पुष्टी केली आहे.
💥समुद्राची वाढती उंची म्हणजे काय?
नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लेबोरेटरी’ने ८ जून रोजी घेतलेल्या डेटाच्या आधारे महासागराचा एक नकाशा तयार केला आहे. या नकाशात समुद्राच्या पाण्याचा रंग लाल, पांढरा आणि निळा असा दिसत आहे. लाल रंग हा समुद्राच्या पाण्याची पातळी सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दर्शवतो. नासाने स्पष्ट केले आहे की, महासागराचे तापमान वाढल्यामुळे पाण्याचे आकारमान (वॉल्यूम) वाढते आणि त्यामुळे समुद्राची पातळी वर सरकते. पॅसिफिक महासागरातील हा वाढलेला तापमानाचा पारा थेट ‘सुपर अल निनो’ची सुरुवात झाल्याचे सिद्ध करतो.
या उपग्रहाने महासागरात ‘केल्विन लहरी’ देखील रेकॉर्ड केल्या आहेत. हा पॅसिफिक महासागरात शेकडो मैल रुंद पसरलेला गरम पाण्याचा एक अथांग साठा आहे, जो पसरलेला गरम पाण्याचा एक अथांग साठा आहे, जो पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असून मोठ्या प्रमाणावर उष्णता ढकलत आहे.
💥होणार? १९९७ सारख्या भयंकर विनाशाची पुनरावृत्ती
‘सेंटिनल-६’ उपग्रहाच्या उप-प्रकल्प शास्त्रज्ञ डॉ. सेवेरिन फोर्नियर यांनी धोक्याचा इशारा देताना म्हटले आहे की, “८ जून रोजी पॅसिफिक महासागरात दिसलेली परिस्थिती हुबेहूब १९९७ सारखी आहे.” १९९७ मध्ये जगाने आतापर्यंतचा सर्वात भीषण आणि विनाशकारी ‘अल निनो’ अनुभवला होता. जागतिक हवामान संघटनेने आधीच चेतावणी दिली आहे की, या बदलांमुळे जगातील जवळपास सर्वच भागांमध्ये तापमान विक्रमी पातळीवर पोहोचेल. हा अल निनो गेल्या १५० वर्षांतील सर्वात भीषण असण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
()(भारताच्या ४ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार?
‘सुपर अल निनो’चा थेट आणि मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात आधीच उष्णतेची लाट असून अनेक राज्यांत तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. त्यातच जून ते सप्टेंबर या काळात पडणारा मान्सूनचा पाऊस नुकताच दोन आठवड्यांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाला आहे. भारताची सुमारे ४ ट्रिलियन डॉलरची (४ लाख कोटी डॉलर्स) अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे मान्सूनच्या पावसावर आणि शेतीवर अवलंबून आहे. जुलैच्या मध्यापर्यंत हा मान्सून संपूर्ण देश व्यापेल अशी अपेक्षा असली, तरी ‘सुपर अल निनो’ मुळे मान्सूनचा पॅटर्न बिघडून दुष्काळ किंवा अपुऱ्या पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्यामुळे भारतीय शेती आणि महागाईवर याचा थेट परिणाम दिसेल.
