🛑शिरसंगी, किणे परिसरात भाजपच्या प्रचाराचा झंझावात; महिला व युवकांचा लक्षणीय सहभाग.
🟣करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी
🛑शिरसंगी, किणे परिसरात भाजपच्या प्रचाराचा झंझावात; महिला व युवकांचा लक्षणीय सहभाग.
आजरा.- प्रतिनिधी.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आजरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. उमेदवारांकडून सुरू असलेल्या प्रचाराला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार, वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार समीर पारदे यांच्या शिरसंगी व किणे येथील प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वच ठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या प्रचार रॅलीमध्ये महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार परिसरातील नागरिकांनी केला.

या प्रचारफेरीत बळवंत शिंत्रे, सुरेश गिलबिले, सखाराम केसरकर, तुकाराम बामणे, विष्णू गुडूळकर, संदीप केसरकर, गणपती पाटील, आकाश सुतार, बाबुराव आडे, सदाशिव वांजोळे, अर्जुन पाटील, पंढरीनाथ कांबळे, सुनील सातवणेकर, निलेश सुतार, संतोष सुतार, दयानंद सुतार, सागर बुरुड, विजय गुरव, राजेंद्र बोडके, रोहित बोडके, संजय कांबळे, पांडुरंग सुतार, वसंत सुतार, संजय हंबीरराव यांच्यासह गावातील युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पेरणोलीतील सुतार समाज बांधवांचा जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार यांना पाठिंबा….
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आजरा तालुक्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रचारात भारतीय जनता पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. सर्वच ठिकाणी भाजपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कामाचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार यांना पसंदी मिळत आहे. पेरणोली (ता. आजरा) येथील सुतार समाज बांधवांनी भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच यावेळी जयवंत सुतार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार देखील सर्वांनी केला आहे.
यावेळी दशरथ अमृते, जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार, पांडुरंग लोंढे, राजू दिक्षित, मुकुंद कांबळे यांच्यासह संभाजी सुतार, काका सुतार, जयदीप सुतार, दिलीप सुतार, आनंदा सुतार, धनाजी सुतार, गोविंदा सुतार, दशरथ सुतार, तानाजी सुतार, विठ्ठल सुतार, मुकुंद सुतार हे समाज बांधव उपस्थित होते.

🟣करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)

कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया महाविद्यालयाने आयोजित ‘कॉस्मॉस जल्लोष’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाच्या सांगता समारंभात प्रसिद्ध सिने अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना करमणूक क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. “करमणूक क्षेत्रात आपले नाणे खणखणीत वाजवायचे असेल, तर केवळ प्रतिभा नव्हे, तर अथक परिश्रम आणि चिकाटी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत पुढे जोडले, “संकटांमध्येही धीर धरा, कारण प्रत्येक अनुभव तुम्हाला मजबूत बनवतो.”
स्वामी समर्थांच्या भूमिकेमुळे सर्वत्र नावलौकिक मिळवलेले अशोक कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून सांगता समारंभाला उपस्थित होते. त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. ‘गजनी’ चित्रपटात आमिर खान यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. उपस्थित विद्यार्थी त्यांच्या कथांमध्ये गुंतून बसले आणि अनेक जणांनी उत्स्फूर्तपणे विचारलेले प्रश्न उत्तरं घेतली.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २७ व २८ जानेवारी या दोन दिवसांत ‘कॉस्मॉस जल्लोष’ अंतर्गत सादरीकरण कला, सर्जनशील कला, साहित्यिक कला, क्रीडा प्रकार तसेच इतर कलात्मक व सर्जनशील क्षेत्रांतील एकूण २१ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात मुंबई परिसरातील ५० हून अधिक महाविद्यालयांमधून २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थी रंगभूमीवर उत्साहाने सादरीकरण करताना पाहिले गेले.
कॉस्मोपॉलिटन संस्थेचे अध्यक्ष श्री.वालिया तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. बागेश्री बांदेकर हे मान्यवर सांगता सोहळ्याला उपस्थित होते. महोत्सव यशस्वी व संस्मरणीय ठरावा यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. बागेश्री बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यापक व विद्यार्थ्यांच्या संघाने मोठ्या समन्वयाने काम केले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि कौशल्याने कार्यक्रमात जीवंतपणा आला.
‘कॉस्मॉस जल्लोष’च्या समन्वयक शावी श्रीवास्तव तसेच सर्व अध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा महोत्सव सर्व संबंधितांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या कलात्मक सादरीकरणातून करमणूक क्षेत्रातील नवसर्जनशीलतेला उत्तम मंच उपलब्ध झाला. उपस्थित प्रेक्षकांनी रंगभूमीवरच्या ऊर्जा आणि प्रतिभेचे कौतुक केले, तर विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

