🛑व्यंकटराव शिक्षण संकुलात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न.
🛑जिल्हा परिषदेच्या कामांना गती देऊया :- पालकमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्र्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न.
🛑व्यंकटराव शिक्षण संकुलात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा या प्रशालेत गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती उत्साहात संपन्न झाली.
यावेळी छ.शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे शुभहस्ते करण्यात आले.. यावेळी सचिव अभिषेक शिंपी, खजिनदार , सुनील पाटील,, संचालक . पांडुरंग जाधव, सचिन शिंपी , सुधाकर जाधव, प्राचार्य एम एम नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, ज्युनिअर कॉलेज विभाग व्यवस्थापक एम.ए. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक रणजीत देसाई, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिमा पूजानानंतर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन कार्य या विषयावर डी आर पाटील यांनी आपले विचार मांडले यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मापासून ते कोल्हापूरच्या राजगादीवर विराजमान झाल्यानंतर लोक हितकारी निर्णय घेत विविध योजना राबविल्या वाडी वस्तीतील झोपडपट्टीतील लोकांपर्यंत स्वतः जाऊन त्यांच्या शेतांच्या बांधावर फेरफटका मारून त्यांच्याबरोबर त्यांची कांदा भाकर खाणारा राजा हा खऱ्या अर्थाने लोकराजा होता. जनतेतील गोरगरीब दिनदलित तसेच विविध जाती धर्मातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वस्तीगृहे उभारली, राधानगरी धरण निर्मिती, आरक्षण पद्धत, अस्पृश्यता निवारण इत्यादी लोकहितवादी निर्णयामुळे लोककल्याणकारी राजा म्हणून सर्वत्र ख्याती लाभलेले तसेच राजर्षी किताब लाभलेले छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर जन माणसांच्या हृदयसिंहासनावर आरुढ होत लोकप्रियता मिळवलेले राजे होत.

यावेळी व्ही.टी. कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्यावर स्वरचित शाहिरी पोवाडा म्हणून अभिवादन केले . अध्यक्षीय भाषणात श्री. शिंपी यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण, सामाजिक कार्य कसे होते व त्यांनी समाजातल्या दिन- दलित कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि विशिष्ट नियमावलीही आखली . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणावरही त्यांनी खर्च करून त्यांना प्रोत्साहन दिले. म्हणून मुलांनी वाचलं पाहिजे शिक्षण घेतले पाहिजे थोरा मोठ्यांचं जीवन कार्य अभ्यासलं पाहिजे. शिक्षणानेच माणसाचा उद्धार होतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.व्ही पाटील व आभार व्ही.एच गवारी यांनी केले.
🛑जिल्हा परिषदेच्या कामांना गती देऊया :- पालकमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्र्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न.
कोल्हापूर.- प्रतिनिधी.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम सुरु असून या कामाला आणखी गती देऊया, असे आवाहन करुन आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता तालुकास्तरीय पुरस्काराची रक्कम 5 हजारावरून 10 हजार रुपये करावी तर जिल्ह्याच्या पुरस्काराची रक्कम 10 हजारावरून 25 हजार रुपयापर्यंत वाढवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या.

शासकीय विश्रामगृहातील सभागृहात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, अरुण जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ई सर्व्हिस बुक, पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा, भविष्य निर्वाह निधी संगणक वेब व मोबाईल प्रणालीचा ऑनलाईन शुभारंभ पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते झाला.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे काम करुन कामातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवावी. कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वजण मिळून काम करुया, असे आवाहन करुन ते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील पुरस्कार हा कामाची पोचपावती असून आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा पुरस्कारामुळे मिळते. गुणवत्तेवर आधारित पुरस्कार मिळाल्यास त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने मिळणारा उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी महापुरातून वाट काढत पोहोचलो होतो. त्यानंतरही उत्कृष्ट आमदार, उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळणे हे कामाचा आगळावेगळा सन्मान देणारे व आणखी काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे व जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरु असून ई सर्व्हिस बुक सह विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच येत्या 26 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 50 हजार लाभार्थ्यांना घरकुल वितरीत करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, समाजाला शिक्षित करण्याचे काम पत्रकार करतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असे पत्रकारांना म्हटले जाते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असून जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमुळे पुरस्कारार्थी, अधिकारी कर्मचारी व पत्रकारांना आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमांची माहिती दिली. पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा व ई सर्व्हिस बुक तयार करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद ही सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तक डिजिटल स्वरूपात ठेवणारी पहिली शासकीय संस्था ठरली आहे.
तसेच भविष्य निर्वाह निधी संगणक वेब व मोबाईल प्रणालीमुळे जमा खर्च जतन करणे तसेच कर्मचाऱ्यांना अद्यावत विवरणपत्र एसएमएस, ऍप द्वारे ऑनलाइन लिंक उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी जिल्हापरिषद कर्मचारी अधिकारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. सर्व पुरस्कर्ते त्यांच्याकडून सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
.