आजरा तालुका गोवा राज्यात समाविष्ट करावा.- विविध संघटनांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन.- आजरा तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील विविध संघटनांनी आजरा तालुका गोवा राज्यात समाविष्ट करावा अशी मागणी केली आहे. याबाबत विविध पक्षातील संघटनेतील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत घेण्यात आलेले निर्णय व याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचे सांगितले. आज दि. १९ रोजी आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.
या बैठकीतील प्रमुख मुद्दे व झालेल्या निर्णय म्हणजे.
महाराष्ट्राचे लोकनेते कै. यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेली पंचायत राज व्यवस्था उध्वस्त करण्याचे काम महाराष्ट्र सरकारने चालू केले आहे. त्यामधील एक भाग म्हणजे आजरा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद मतदार संघ व सहा पंचायत समिती मतदारसंघांपैकी एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती कमी करून तालुक्यातील जनतेवर अन्याय करणे चालू आहे यापूर्वी विधानसभे तील जीप मतदार संघ तीन विधानसभा मतदारसंघाला विभाजन केली आहे.
यामुळे तालुक्याचा आमदार भविष्यामध्ये होईल असे वाटत नाही गेल्या ७० वर्षात तालुक्याचा विकास झाला नाही या तालुक्यामध्ये चार मोठी धरणे झाली परंतु त्यामधील जनतेने पुनर्वसन तालुक्यातील लोकांच्या जमिनी काढून घेऊन केले गडहिंग्लज आणि कर्नाटकातील एकही कुटुंबाच्या जमिनी पुनर्वसनासाठी वापरली गेली नाही. एकही आमदार खासदार तालुक्याबरोबर राहिला नाही. प्रांत कार्यालय गडहिंग्लज ऐवजी गारगोटीचे म्हणजे सदर कार्यालय भुदरगडला केले गेले लोकांचा जराही विचार केला नाही. आजरा तालुका निसर्ग संपन्न आहे. पण पर्यटनाच्या दृष्टीने काडीचेही काम झाले नाही. आजरा तालुका भौगोलिक रचना पहिली असता गोवा राज्याची मिळती जुळती आहे. या तालुक्यांमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय करून उभा केला आहे. या व्यवसायाची मुख्य बाजारपेठ गोवा राज्यात आहे. भाषेमध्ये हा व्यवसाय वाढीसाठी चालना मिळणार आहे. या तालुक्यांमध्ये काजू वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागन असून काजू प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात तयार आहेत.
परंतु काजू बोंडावर प्रक्रिया करून काजू फेनी उद्योगाची उभारणी नसल्यामुळे कोट्यावधीची नुकसान होते. गोवा सरकार धोरणामुळे नवीन प्रक्रिया उद्योग उभा राहून रोजगार निर्मिती मुळे आर्थिक उन्नती मध्ये वाढ होणार आहे. शेतीमालाचे उत्पादित आणणे व्यवसाय फळे यांना हक्काची बाजारपेठ गोवा राज्य मिळणार आहे. पणजी साठी जागतिक वीजेचे बंदर गोवा राज्यामध्ये असल्यामुळे आमच्या दर्जेदार शेतीमाल निर्मिती चालना मिळणार आहे. आजरा तालुका पासून मुंबई राजधानी ४५० कि. कि. मीटर आहे. पणजी ही. १०० ते २०० कि. मीटर आहे. त्यामुळे आमच्या तालुक्याची समस्या मांडण्या साठी मुख्यमंत्री आम्हाला कमी अंतरावर भेटणार आहेत. संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गामुळे आमची जवळीकता वाढली व आमच्या मागणीचा विचार सनदशील मार्गाने करून आमचा आजरा तालुका गोवा राज्यात जोडावा अशी आमची विनंती आहे. असे सदर बैठकीत निर्णय झाला. व याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तानाजी देसाई, प्रकाश कोंडुसकर, संजय तर्डेकर, राजू होलम, शिवाजी गुरव जी.एम. पाटील सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.