महात्मा गांधीच्या विचारानुसार शहराकडून खेड्याकडे जाऊन खेड्यांचा विकास करावा असे सांगितले असतांना.- हरकती न घेता पंचायत समिती गण कमी केले कसे. आजरा सरपंच संघटनेचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ व पंचायत समीती दोन गण मतदारसंघ प्रशासनाने हरकती न घेता कमी केल्या याबाबत न्याय मागण्यासाठी आजरा सरपंच संघटनेच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा तालुका अत्यंत मागास व डोगराळ व विकासापासून वंचीत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर तालूक्याला एकच वेळ आमदार मिळाले त्यामुळे तालुक्याचा आमदार नसल्यामुळे तालुका विकासापासून वंचित राहीला आहे. याकडे सातत्याने शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महात्मा गांधीच्या विचारानुसार शहराकडून खेड्याकडे जाऊन खेड्यांचा विकास करावा असे असतांना शासनाचे त्याप्रमाणे कामकाज होताना दिसत नाही.
सद्या शासनाने लोकसंस्खेच्या आधारावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आगदार शहरामध्ये जास्त असून शहरांचा विकास होत चालला आहे. पण खेडयांचा विकास थांबला आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला एक आमदार हवा असताना सुद्धा तसे होताना दिसत नाही.
शासनाने जिल्हा परीषद व पंचायत समीतीचे निवडणूकीसाठी आजरा तालुक्यामध्ये १९९० च्या दशकापर्यंत जिल्हा परीषदेचे ४ मतदार संघ होते व पंचायत समीतीचे ८ मतदार संघ होते पण नंतर शासनाने अचानक जिल्हा परीषदेचे ३ मतदार संघ पंचायत समीतीचे ६ मतदार संघ केले पण परवा अचानक शासनाने जिल्हापरीषदेचे २ मतदार संघ व पंचायत समीती ४ मतदार संघ झालेले पेपरच्या बातमीवरून कळाले आहे यावरून शासन आजरा तालुक्यावर कायमपणे अन्याय करतच आहे त्यामुळे तालुक्यातील लोक आत्ता यापुढे अन्याय सहन करणार नाहीत याची नोंद घ्यावी. तसेच
आजरा तालुक्यातील लोकसंख्या शासनाच्या आकडेवारी नुसार १,०२,९५६ इतकी आहे त्याचप्रमाणे गगणबावडा तालुक्यातील लोकसंस्ख्या ३५,७७२ इतकी असूनही गगणबावडा येथे जिल्हापरीषदेचे २ मतदार संघ व पंचायत संमीत्तीचे ४ मतदार संघ शासनाने चालू ठेवले आहेत, पण आजरा तालुक्याची लोकसंख्या १,०२,९५६ असताना पुर्वीप्रमाणेच आजरा तालूक्याचे ३ जिल्हा परिषदेचे १६/२०६ पंचायत समीतीचे मतदार संघ राहीलेच पाहीजेत अशी सर्वांची न्याय मागणी आहे.
आजरा तालुक्याचा पश्चिम भाग अजुनही विकासापासून वंचीत आहे. पश्चिम भागातील गावे, वाड्या, वस्त्या, धनगरवाडे, ही अजूनही विकासापासून वंचीत आहेत हा भाग प्रवाहामध्ये येण्यासाठी यापुर्वी असणारा तालुक्यातील तिसरा पेरणोली जिल्हा परीषद मतदार संघ तसाच ठेवुन गवसे व पेरणोली असे दोन पंचायत समीती मतदार संघ कायम ठेवून आजरा तालुक्यावर होणारा अन्याय दूर करावा.
आजरा तालूक्यामध्ये पुर्वीप्रमाणे उत्तूर जि. प. कोळींद्रे जि. प. व पेरणोली जि. प. हे तिन्ही मतदार कायम ठेवून उत्तूर, भादवण, गजरगांव, कोळींद्रे पेरणोली व गवसे असे पंचायत समितीचे मतदार संघ कायम ठेवावेत यासाठी आमच्या आजरा तालूक्याच्या लोकप्रतिनिधींनी विशेष काळजीपुर्वक व्यक्तीगत लक्ष घालून आजरा तालूक्यावर होणरा अन्याय दूर करावा अशी कळकळीची विनंती आहे.
याबाबत योग्य निर्णय झाला नाहीतर तालुक्यातील जनतेमध्ये उद्रेक होऊन वेगवेगळी आंदोलने सनदशीर मार्गाने होतील शेवटचा पर्याय म्हणजे येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणूकामध्ये मतदानावर बहिष्कार टाकला जाईल या गोष्टीचा गांभीयाने विचार करून पुर्वीप्रमाणे जिल्हा परीषदेचे ३ व पंचायत समीतीचे ६ मतदार संघ चालु ठेवण्यात यावेत असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी सरपंच संघटना ता. अध्यक्ष बापू निऊगरे, सौ. सुषमा पाटील महिला आघाडी अध्यक्ष, सरपंच भारती डेळेकर, संभाजी सरदेसाई, अमोल बांभरे सौ. सविता जाधव, सौ. जयश्री गिलबिले सह संरपंच संघटनेचे सदस्य उपस्थित होते.