🛑गिरणी कामगारांनी दलालांपासून सावध रहावे.- सर्व श्रमिक संघटना
🛑२०२४ अतिवृष्टीने घरांची पडझड – नुकसान भरपाई अद्यापही नाही.- लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.
🛑आजरा – नगरपंचायत नगराध्यक्ष पदासह ताकतीने लढवणार.- अन्याय निवारण समितीचा बैठकीत निर्णय.
🛑चार सुत्री व श्री पध्दतीने भात पिक पद्धत महत्वाची.- सुर्यकांत दोरुगडे
🛑गिरणी कामगारांनी दलालांपासून सावध रहावे.- सर्व श्रमिक संघटना
आजरा.- प्रतिनिधी.
सद्यस्थिती मध्ये गिरणी कामगारांनी दलालां पासून सावध रहावे, मुंबई मध्ये सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांचा २००५ पासून सुरू झालेला लढा ग्रामीण भागात २००८ मध्ये सुरू झाला. सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने ग्रामीण भागातील गिरणी कामगारांना जागृत करण्यात आले, चळवळीच्या दबावामुळे २०१० व २०११ साली गिरणी कामगारांचे माहिती संकलन करून, फॉर्म भरण्यासाठी सरकारला भाग पाडले. संघटनेच्या रेट्यामुळे, तत्कालीन कॉग्रेस सरकारने मुंबई मध्ये घरे बांधून, लॉटरी काढण्याचे काम सुरू केले.
पुढे २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. त्यांनी आजपर्यंत एकही घर मुंबई मध्ये बांधलेले नाही. उलट गिरणी कामगारांना कोनगाव, पनवेल या ठिकाणीची एम एम आर डी ची घरे, मुंबई बाहेर देण्याचे षडयंत्र या सरकारने रचले असून, आता तर मुंबई पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगणी, सेलू येथील घरे गिरणी कामगारांच्या माथी मारण्यासाठी दलाला मार्फत षडयंत्र रचले जात असून, गिरणी कामगारांना मुंबई बाहेर घालविण्याचे पाप महायुती सरकार करत आहे.
अशा वेळी सर्व श्रमिक संघटना व इतर संघटनाच्या वतीने गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर मोफत घर हा लढा अधिक तीव्र ताकदीने उभा करण्याचा प्रयत्न केला जात असताना, काही दलाल संघटना सरकारला मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत, हा डाव हाणून पाडला पाहिजे. या विचाराने सर्व गिरणी कामगार वारसदार यांनी मोठ्या ताकदीने जागरूकपणे संघर्षामध्ये उतरले पाहिजे, तसेच गिरणी कामगारांनी दलालांच्या अमिषाला बळी पडूनये असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेचे आजरा तालुका अध्यक्ष कॉ. शांताराम पाटील, नारायण भंडागे शिवाजी सांवत यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.
🛑२०२४ अतिवृष्टीने घरांची पडझड – नुकसान भरपाई अद्यापही नाही.- लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.
( विरोधी पक्षनेते ही विसरले.- आंदोलन ही नाही.- निवेदनही नाही.)
संपादकीय.- विशेष

पेरणीला सुरुवात होण्याच्या अगोदरच.. वळवाच्या पावसाने झोडपून काढले आहे . यामध्ये मान्सून दाखल झाला. यामुळे यावर्षी शेतकरी पेरणी कधी करणार पेरणी होणार की नाही. या संभ्रम अवस्थेत शेतकरी आहेत. यामध्ये शासनाचे हवामान अंदाज अतिवृष्टी पाऊस येणार असल्याचे संदेश येत आहेत. यामध्ये मागील २०२४ सालात अतिवृष्टीने झालेली घरांची पडझड त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. आजरा तालुक्यात घरांची पडझड झालेली संख्या अंदाजे ६०० शे आसपास असावी. नुकसान ग्रस्तांचे पंचनामे झाले. परंतु अद्यापही नुकसान भरपाई का ? मिळाली नाही. व आता चालू वर्षात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशा पडझड झालेल्या घरामध्ये राहायचं कसं मग मुळात पंचनामे कशासाठी करता, घोषणा कशासाठी केल्या जातात, सर्वसामान्य जनतेकडे व शेतकऱ्यांच्याकडे मुळात शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
असं म्हणणे वावगे ठरणार नाही. असे समजते की २०२४ मध्ये झालेली अतिवृष्टी मध्ये महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापी नुकसान भरपाई मिळाली नाही. म्हणजे राज्यातील तीन पक्षांचा असलेल्या सरकार याच्यामध्ये एकही नेत्याला आपल्या विभागातील अतिवृष्टीने घरांची झालेली पडझड अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याबाबत एकही नेत्यांच्या मनात, लक्षातही नाही. २०२५ मधील सुरुवात झालेला वळवाचा पाऊस, मान्सून या पावसाचा अंदाज घेता. पुढील वर्षात अनेक वेगवेगळ्या पिकांची पेरणी होते की नाही. याबाबत अजूनही शंका आहे. अशा पिकांच्या पेरण्या नाही झाल्यास पुढील काळात याचा देखील फटका बसणार आहे. भात पिक हे रोजच्या आहारातील महत्त्वाचा आहार आहे. भात पिकाची पेरणी अद्याप अनेक शेतकऱ्यांची झालेली नाही. पर्याय म्हणून रोप लागन होऊ शकते परंतु ज्या ठिकाणी फक्त पावसाच्या पाण्यावर भात पीके घेतली जातात अशा ठिकाणी सद्यस्थितीत भात टोकनणी होऊ शकत नसल्याने. पुढील हंगामात भात पिकाची कमतरता दिसून येईल.
एकीकडे वाढती महागाई, सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे सर्वसामान्य जनता हि या महागाईला कंटाळली असताना रोज नवनवे नियम अटी या सर्व गोष्टी शासनाला करता येतात.. राज्यभर २०२४ मध्ये अतिवृष्टीने घरांची झालेली पडझड वाहून गेलेली शेती, याबाबत नुकसान भरपाई अजूनही देता येत नाही. म्हणजेच स्थानिक नेत्यांची देखील या जनतेवर लक्ष नाही. परंतु दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या मुळे झालेले शतकाचे नुकसान याबाबत काडीमोल का असेना वन विभागाने शेतीच्या नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खात्यावर जमा केली. परंतु घराची पडझड याबाबत कोणतेही निवेदन या आंदोलन तालुक्यात जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात झालेले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे कितपत लक्ष सर्वसामान्य जनतेवरती आहे. हे जनतेच्या लक्षात येते. शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आपला उदरनिर्वाह करत आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कडे शासनाने दुर्लक्ष करू नये अशी मागणी होत आहे.
🛑आजरा – नगरपंचायत नगराध्यक्ष पदासह ताकतीने लढवणार.- अन्याय निवारण समितीचा बैठकीत निर्णय.
आजरा – प्रतिनिधी

आजरा येथील होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासह सर्व जागा लढवणार असल्याचा निर्णय निर्णय दि. १५-०६-२०२५ रोजी आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती यांची महत्त्वपूर्ण बैठकत घेण्यात आला. सदर बैठक आजरा येथे पार पडली. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. जरा नगरपंचायत च्या होऊ घातलेल्या निवडणुकीत संदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत एकमताने ठरविण्यात आले की, अन्याय निवारण समिती नगराध्यक्ष पदासह सर्व १७ नगरसेवक पदांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. जनतेच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देण्यासाठी, आणि विकासाचा पर्याय ठरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या हितासाठी पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प समितीने या वेळी व्यक्त केला. अन्याय निवारण समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
🛑चार सुत्री व श्री पध्दतीने भात पिक पद्धत महत्वाची.- सुर्यकांत दोरुगडे
आजरा – प्रतिनिधी.

शेती मध्ये आमूलाग्र बदल करुन शेतकर्याने विष मुक्त शेती करण्यासाठी सेद्रीय शेती करण्यात यावी.आधुनिक तंत्रज्ञ समजून घेऊन भात पिक कमी खर्चात जादा ऊत्पादन घेण्यासाठी चार सुत्री व श्री पध्दतीचा अवलंब करावा असे आव्हाण शेती तज्ञ सुर्यकांत दोरुगडे यानी मलिग्रे येथील सभेत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विश्वास बुगडे होते.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) कोल्हापूर याच्या वतीने खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आली. प्रास्ताविक अमित यमगेकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.यावेळी पी ए माळी मंडळ कृषी अधिकारी यानी बदलते हवामान व पावसाळ्यात घ्यावयाची काळजी या संधर्भात मार्गदर्शन केले यावेळी योगेश जगताप सहाय्यक कृषी अधिकारी, तृप्ती पाटील कृषी विभाग,चाळू केंगारे उपसरपंच, शिवाजी भगुत्रे, बाबू बुगडे, परशराम बुगडे, शिवाजी ईक्के याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते आभार सुधाकर घोरपडे यानी मानले.