एक. जि.प मतदार संघ व दोन पं स. समिती गण कमी.- आजरा तालुक्यावर हा अन्याय कशासाठी.- सर्वपक्षीय नेत्यांनी जाब विचारणे गरजेचे.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यावर नेहमीच अन्याय का. ? कै माजी आम. वसंतराव देसाई यांच्यानंतर अद्याप विधानसभेला लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली नाही.
निवडून आयोगाने आजरा तालुक्यातील मतदार असणाऱ्या जनतेवर अन्याय करण्याच व लोकशाहीचा गळा घोटण्याच काम सातत्याने चालवले आहे. मग तालुक्यातील नागरिकांनी काय विचार करावा.
विधानसभा मतदार संघाचे तीन तुकडे करुन तालुक्यातील जनतेची पिळवणूक झालेली असताना पुन्हा एकदा तालुक्यातील जिल्हा परिषदचा एक व पंचायत समिती चे दोन गण कमी करणेत येत आहेत. याबाबत जनतेची विचार न करता मनमानी कारभार शासन करत असल्याचा जावा येथील नागरिक करत आहेत.
आजरा तालुका दुर्गम डोंगराळ वाडीवस्तींचा आहे. छोटी मोठी खेडी विरळ लोकसंख्या अशी रचना असताना तालुक्याला विधानसभा लढवता येत नाही. असे असताना हा वेगळाच एक धक्का आहे. शासन म्हणते लोकसंख्या निहाय मतदार संघाची रचना केली आहे. पण शासनाने हे सांगावे जनगणना होऊन किती वर्षे झाली आहेत. आणि कोणत्या सालची लोकसंख्या ग्राह्य धरली आहे.
जर पूर्वी चे आजरा जि. प मधून फक्त आजरा नगरपंचायत वेगळी झाले नंतर उर्वरित गावा मधून व लोकसंख्येचा विचार करुन पेरनोली, कोळींद्रे व उत्तूर मतदार घोषित करुन आरक्षण सोडत ही झाली होती. मग आता कुठे माशी सिंकली याची सखोल माहिती घ्यावी. लागणार या साठी तालुक्यातील एक आमदार आणि दोन नामदार तसेच तालुक्यातील जेष्ठ लोकप्रतिनिधी, मतदार, नागरिक व सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आजरा तालुक्यावरील राजकीय अन्याय विरुद्धात आवाज उठवणे गरजेचे आहे. याबाबत सर्वपक्षीय उठाव झाला पाहिजे.
सर्व हेवेदावे बाजूला ठेवून तालुक्याच्या हितासाठी व अशा पद्धतीने शासन जर परस्पर निर्णय घेऊन अन्याय करत असेल तर याचा जाब विचारणे काळाची गरज आहे. याबाबत मतदार म्हणून प्रकाश कोंडूसकर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून मत व्यक्त केले होते.
परंतु अनेक नेत्यांच्या मनामध्ये खदखद व हा आपल्यावर अन्याय झाला असल्याची चर्चा तालुक्यात आहे. परंतु ही फक्त चर्चा न करता याबाबत न्याय मागण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन हाती घेतले पाहिजे. अशी मागणी देखील नागरिकांच्या कडून होत आहे.