🟥राज्यात मान्सूनचा कहर.-
अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस.- रत्नागिरी, रायगडला आज रेड अलर्ट.
🟥युद्धाचा भडका.- इराणच्या हल्ल्यात इस्रायल हादरला.- १५० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागली.
🌧️मुंबई, रायगडला आज.- तर सिंधुदुर्गला उद्या ‘रेड अलर्ट’ !
🛑रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी.- राजापूरमध्ये सर्वाधिक 119.87 मिमी पावसाची नोंद.
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई, पुणे, अहिल्यानगर भागांतून मान्सून आज शनिवारी (14 जून) पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच मुंबई व रायगडला आज, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या (जून 15, रविवारी) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात 14 ते 19 जून, मध्य महाराष्ट्रात 14 व 15 जून, मराठवाड्यात 17 जून, तर विदर्भात 16 ते 19 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची द्रोणीय रेषा वायव्य राजस्थानपासून मध्यप्रदेश, विदर्भ मार्गे मराठवाड्यापर्यंत गेल्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कोकणात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. शनिवारी आणि रविवारी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. शनिवारी ठाणे, मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा आणि जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ लागू करण्यात आला आहे. मान्सूनची वाटचाल पाहता, पुढील काही दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभर अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पावसाचे दृश्य दिसत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड भागात 46 मिमी, तर शिवाजीनगर भागात 26.5 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी(15 जून) साठी पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
🟥युद्धाचा भडका.- इराणच्या हल्ल्यात इस्रायल हादरला.- १५० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागली
तेहरान :- वृत्तसंस्था
इस्रायल आणि इराणमधील तणाव चांगलाच वाढला आहे. इस्त्रायलने शुक्रवारी इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हल्ले केले होते. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सहा अणू शास्त्रज्ञ आणि लष्कराच्या २० कमांडरचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संतापलेल्या इराणने इस्रायलला प्रत्युत्तर दिले. इराणच्या सैन्यांनी इस्रायलवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलच्या दिशेने १५० पेक्षा जास्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस नावाच्या मोहिमेद्वारे इराणने इस्राइलला प्रत्युत्तर दिलं.
इराणने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणी माध्यमांनी दावा केला आहे की, इस्रायलच्या विविध शहरांवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले आणि जेरुसलेम आणि तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यात १५ जण जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर इस्रायलमधील अनेक भागात सायरन वाजवण्यात आले, अशी माहिती इस्रायल डिफेन्स फोर्सेसने एका निवेदनातून दिली. इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलचे हवाई संरक्षण दल देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. नागरिकांना बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या हल्ल्यांदरम्यान इराणने दावा केला आहे की, त्यांनी एका इस्रायली पायलटला जिवंत पकडले आहे. हा पायलट अलीकडेच इराणी लक्ष्यांना लक्ष्य करणाऱ्या विमानांपैकी एकाचा सदस्य होता. इस्रायलकडून अद्याप या दाव्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे आणि युद्धासारखी परिस्थिती कायम आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
🌧️मुंबई, रायगडला आज.- तर सिंधुदुर्गला उद्या ‘रेड अलर्ट’ !
मुंबई :- प्रतिनिधी
राज्यात मान्सून जोरदार सक्रिय झाला असून तो मुंबई, पुणे, अहिल्यानगर भागातून शनिवारी (दि. १४) पुढे सरकण्याची शक्यता आहे. मुंबई, रायगडला शनिवारी, तर सिंधुदुर्गला रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात १४ ते १९, मध्य महाराष्ट्रात १४ व १५, मराठवाड्यात १७ जून तर विदर्भात १६ ते १९ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी रात्री राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला, तर शुक्रवारीही सकाळी आणि सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्याच्या विविध भागांत विविध प्रकारचे अलर्ट दिले आहेत. यात कोकण भागाला १४ ते १९ पर्यंत ‘अति मुसळधार’ पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत शनिवारी ५० ते ६० प्रतितास किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल, असे मुंबई विभागाच्या हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसासाठी अनुकूल असे वातावरण राहील. त्याचबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळसदृश स्थिती उद् भवण्याची शक्यता असल्याचे सुषमा नायर यांनी सांगितले.
🛑रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी.- राजापूरमध्ये सर्वाधिक 119.87 मिमी पावसाची नोंद
( अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना तर अनेक भागात व अनेक नागरिकांच्याही घरात पाणी शिरल्याने नुकसान.)
रत्नागिरी :- प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली असून, दिनांक 14 जून रोजी एकूण 484.18 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून येथे 119.87 मिमी पाऊस झाला आहे.
राजापूर तालुक्याच्या पश्चिम किणारपट्टीच्या भागात अनेक घरान्मध्ये पाणी भरल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे . भालावली नाटे बांधकर वाडी आदी भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसानीचा सामना करावा लागला आहे .राजापूर शहरातील जवाहर चौकात करंबेळकर यांच्या हॉटेलपर्यंत कोदवली नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली . पुराचे पाणी शहारात शिरण्याच्या शक्यतेने बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने सावधानतेचा पवित्रा घेतला होता . राजापूर शहराकडुन राजापूर रोड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यावरही पाणी भरल्याने काही काळ वाहतुक खोळंबली होती . प्रशासनाने या मार्गावरुन प्रवास न करण्याच्या सुचना दिल्या होत्या .तालुक्यात अनेक ठिकाणी संरक्षक भिंतींसह रस्ते वाहुन गेले आहेत . तर अनेक ठिकाणी वीजवितरण कंपणीच्या वीजवाहीण्यांवर झाडे पडल्याने अनेक गावे अंधारात बुडाली आहेत . यामध्ये महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे . तर अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळुन पडल्याने अनेक गावातील वाहतुक बंद आहे .
🌧️☔आडिवरे येथील महाकाली मंदिराच्या परिसरातही पाणी भरले होते .
🌧️कोदवली राववाडी येथील पोलावरुन पाणी गेल्याने नळपाणी योजनेची पाइप रस्त्यावर आली आहे .
🅾️रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
राजापूर तालुका – 119.87 मिमी
रत्नागिरी – 77.55 मिमी
लांजा – 58.60 मिमी
संगमेश्वर – 51.91 मिमी
खेड – 48.57 मिमी
दापोली – 47.57 मिमी
मंडणगड – 31.75 मिमी
चिपळूण – 25.56 मिमी
गुहागर – 22.80 मिमी
आजच्या पावसाचा सरासरी हिशोब लावला असता प्रति तालुका सरासरी पाऊस 53.79 मिमी इतका झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून हवामान विभागाच्या सूचनांनुसार सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.