Homeकोंकण - ठाणेबहुजन मुक्ती पार्टीचे - वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण.- एक दिवसीय...

बहुजन मुक्ती पार्टीचे – वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण.- एक दिवसीय धरणे आंदोलन.🛑आजऱ्यात काजू उद्योजकांची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

🛑बहुजन मुक्ती पार्टीचे – वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण.- एक दिवसीय धरणे आंदोलन.
🛑आजऱ्यात काजू उद्योजकांची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

बहुजन मुक्ती पार्टीचे – वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण.- एक दिवसीय धरणे आंदोलन.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

बहुजन मुक्ती पार्टीचे वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण बाबत आजरा वनविभागावर एक दिवसीय धरणे आंदोलन दि. ३० मे २०२५ रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण वनविभागाने स्वतः करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची पूर्वसूचना वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पत्र देऊन बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली होती. तरीही वनपरिक्षेत्र अधिकारी आजरा या आंदोलनाला उपस्थित राहिले नाहीत.‌ त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून वनपाल शकील मुजावर व भरत निकम यांना पाठवले होते. त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा जोरदार निषेध केला. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना फोनवरून त्यांच्या अनुपस्थितीबद्दल खड्या शब्दात जाब विचारला. याशिवाय दोन्ही उपस्थित वनपालांनाही बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.


बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्यामुळे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा उपवनसंरक्षक यांच्याशी चर्चा करण्याचा आग्रह केला, त्याशिवाय आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही असे घोषित केले.
“तालुक्याची कमिटी बनवून कोल्हापूरला जाऊन जिल्हा उपसंरक्षकांची भेट घेऊया”, अशी भूमिका वनविभागाच्या वतीने मांडण्यात आली. परंतु या भूमिकेला बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला व जिल्हा उपवनसंरक्षकांनी आजऱ्यामध्ये येऊन येथील शेतकऱ्यांची भेट घेतली पाहिजे ही इच्छा व्यक्त केली. कारण गव्यांचे हल्ले आजऱ्यामध्ये होत आहेत, येथील शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे त्यामुळे उपवनसंरक्षक यांनी आजरा मध्ये येणेच संयुक्तिक होईल‌, असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले.
यानंतर जिल्हा उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्याशी बोलल्यानंतर २६ जून २०२५ रोजी वनविभाग व बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची समोरासमोर चर्चा घडवून आणली जाणार आहे असे उपस्थित व ना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसे रितसर पत्र वनविभागाने बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले.‌ तसे पत्र प्राप्त झाल्यानंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.‌


परंतु यानंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुढील शृंखलाबद्ध आंदोलनाचे निवेदन सुद्धा लागलीच वनपरिक्षेत्र अधिकारी तथा तहसीलदार यांना सुपूर्द केले. जोपर्यंत वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा प्रश्न कायमचा सुटत नाही तोपर्यंत आंदोलन कधीही मागे घेतले जाणार नाही असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, ॲड. विद्या त्रिरत्ने, किरण केके, राहुल मोरे, अमित सुळेकर, दशरथ सोनुले, संदीप दाभिलकर, काशिनाथ मोरे, शिवाजी गुरव, मसणू सुतार, द्वारका कांबळे, नाहिदा महागोंडे, नाझिया शेख, नितीन राऊत, सूर्यकांत कांबळे, दत्तराज पाटील, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

🛑आजऱ्यात काजू उद्योजकांची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा येथील कैश्यू मॅन्युफैक्चार्य वेलफेअर असोसिएशनची ३ री वार्षिक सर्वसाधारण सभा दि २८ रोजी खोराटे रेस्टॉरेट सभागृहात संपन्न झाली. स्वागत व अध्यक्ष प्रकाश कोडुसकर यांनी केले. यावेळी बोलताना म्हणाले. आजरा काजू असोशिएशन स्थापन होऊन तिन वर्षे झाली असोशिएशन मध्ये आजरा तालुक्यातील सर्व काजू फॅक्टरी मालक यांनी असोसिएशनचे सभासद होणे गरजेचे आहे. तसेच आजरा तालुक्यामध्ये छोटे-मोठे ३०० ते ३५० उद्योजक या काजु – व्यव‌साया मध्ये काम करत आहेत. असोशिएशन मार्फत उद्योजकांना उद्योगात येणाऱ्या अडी-अडाणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शासकीय कार्यालय, बाजार समिती इत्यादी प्रश्न सोडवण्यात असोशिएशन – यशस्वी झाली आहे. भविष्यात बॉयलर वजन काटा लायसन्स तसेच लेबर कार्यालय इत्यादी समस्या येण्याची शक्यता आहे.

तसेच असोशिएशन मार्फत ४५ उद्योजकांना 2.5%-S.GST परतावा मिळणे कामी सहकार्य झाले आहे. जास्तीत जास्त-उद्योजकांनी आपले आर्थिक व्यवहार GST बीलावर करावेत, बिलावर – व्यापार केलेस फसवणूक होणार नाही. व फसवणूक झालेस कायदेशीर – कारवाई करणेय सोपे होईल याचा विचार कढून उद्योजकांनी काळजी पूर्वक व सुरक्षीत व्यवसाय करावा असे श्री कोडुसकर यांनी सांगीतले

Oplus_131072

तसेच परदेशी काजू बी व तयार माल खरेदी-निकी संदर्भात इंपोर्टर-एक्सपोर्टर आनंद भेसडिया यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच MSEB कडून सातत्याने होल्टेज कमी-जादा प्रमाण झालने-माशिकीवर परीणाम होऊन नुकसान होते. यासाठी क्रायकार्ड या कंपणीचे रिजनल मैनेजर मानस पोल यांनी स्टॅबिलायझर चे महत्व या बाबत मार्गदर्शन केले.
अहवाल वाचन व नफा – तोटा पत्रक, ताळेबंद वाचन सचिव परेश पोतदार यांनी केले
संचालक मंडळ असोसिशन चे हिताचे निर्णय व पोटनियम दुरुस्तीचे अधिकार देणेची मान्यता एकमताने मंजूर करणेत आली. असोसिएशनचे सर्व सभासद तसेच पांडुरंग जोशिलकर, अमोल मुरुकरे, दशस्य बोलकू भुषण नांदवडेकर, उत्तम सलामवाडे यांनी मनोगतानून असोसिएशनच्या कामकाजा संदर्भात समाधान व्यक्त केले.
आभार द‌यानंद भुसारी यांनी मानले

या बैठकीला संचालक विकास फाळणेकर संदिय पोवार निशांत जोशी, दयानंद देवळकर, विश्वास जाधव सुदेश चौगुले भास्कर निकम न जेष्ठ मार्गदर्शक. महादेव पोकर बाबुराव मांजरेकर सर सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.