Home Uncategorized आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले महत्वाचे निर्णय पहा👇.🟥6 कोटींचं बक्षीस असलेल्या...

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले महत्वाचे निर्णय पहा👇.🟥6 कोटींचं बक्षीस असलेल्या खतरनाक नक्षलवाद्याला बेड्या.- सुरक्षा दलांना मोठं यश

Oplus_131072

🛑आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले महत्वाचे निर्णय पहा👇.
🟥6 कोटींचं बक्षीस असलेल्या खतरनाक नक्षलवाद्याला बेड्या.- सुरक्षा दलांना मोठं यश

🟥आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले महत्वाचे निर्णय.- वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण तसेच वैद्यकीय सुविधेसह टोलमध्ये दिली जाणार सवलत

मुंबई.- प्रतिनिधी

Oplus_131072

आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती.

या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी. वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

मागील वर्षीसारखे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल. पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी दिलेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल. पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल. यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

🟥6 कोटींचं बक्षीस असलेल्या खतरनाक नक्षलवाद्याला बेड्या.- सुरक्षा दलांना मोठं यश

कोरापूट :- वृत्तसंस्था

केंद्र सरकारकडून देशभरातील विविध राज्यांमध्ये नक्षलवाद विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील तसे संकेत दिले आहेत. यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये नक्षलवाद विरोधात स्पेशल ऑपरेशन सुरु आहे. या ऑपरेशनमधून अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला जातोय. तर काही ठिकाणी नक्षलवाद्यांना अटक केली जात आहे. सुरक्षा दलांनी अशाच प्रकारची मोठी कारवाई आज केली आहे. पोलिसांनी नक्षलवादी हिडमा याला बेड्या ठोकल्या आहेत.सुरक्षा दलांची नक्षलवादाविरोधात मोठी कारवाई सुरु आहे. या कारवाईत सुरक्षा दलांना सर्वात मोठं यश आलं आहे. काही लाखांचं बक्षीस असणाऱ्या कुख्यात नक्षलवादी हिडमा याला अटक करण्यात आली आहे. ओडिशा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ओडिशाच्या कोरापूर जिल्ह्यातून हिडमाला अटक करण्यात आली आहे. हिडमाकडून Ak-47 रायफल आणि 35 काडतूसं देखील जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांच्या या कारवाईने ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमाभागात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांच्या नेटवर्कला मोठा दणका बसला आहे. कुख्यात नक्षलवादी कुंजाम हिडमा उर्फ मोहन याला कोरापूट पोलीस आणि डिस्ट्रिक्ट वॉलंट्री फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. कोरापूट जिल्ह्यातील हाइपारीगुडा पोलीस ठाणे हद्दीत पेटगुडा जंगलात हिडमा याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

🟥हिडमा हा महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया येथील नक्षलग्रस्त भागात नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता, अशी माहिती आहे. त्याच्याकडे स्फोटकं सापडली आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून AK-47 रायफल, 35 जिवंत काडतुसे, 117 डेटोनेटर, गनपावडर, रेडिओ, चाकू आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास सुरु आहे.नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलांचं सुरु असलेलं ऑपरेशन आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता आहे. या ऑपरेशनमुळे नक्षलवाद्यांच्या नाकेनऊ आलं आहे. पोलिसांकडून जहाल नक्षलवाद्यांचा जंगलात सर्च ऑपरेशन करुन खात्मा केला जातोय. यामुळे आगामी काळात हिडमा सारख्या अनेक कुख्यात नक्षलवाद्यांना बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.