Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रश्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आजऱ्यात महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन.

श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आजऱ्यात महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन.

श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आजऱ्यात महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन.

आजरा.- प्रतिनिधी

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहून भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पहिल्यांदा मांडणी केली. ते केवळ नकारात्मक मांडणी करीत राहिले नाहीत तर त्यांनी शेती, शेतकरी यांच्या विकासाची भूमिका मांडत पर्यायी विकासाचा पाया घातला. माथा ते पायथा असे नियोजन करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, गरज पडेल तिथे बाहेरून पाणी आणून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बंद पाईपने मोजून देण्याची मागणी त्यांनी पहिल्यांदा केली.

जमीन पाणी नियोजनाची शास्त्रीय मांडणी पहिल्यांदा फुलेनी केली. जीवनाचे असे एकही क्षेत्र नसेल ज्या क्षेत्रात त्यानी काम केले नाही. साहित्य संस्कृती, शिक्षण, जातीभेद, अस्पृश्यता निवारण यासह धर्मसुधारणा या सर्वच क्षेत्रात त्यानी अभूतपूर्व असे काम केले आहे. म्हणूनच ते आजही सर्वच चळवळीचे मार्गदर्शक आहेत. असे मुद्दे कॉम्रेड संपत देसाई यांनी आपल्या भाषणात मांडले.

सुरवातीला दशरथ घुरे यांनी प्रास्ताविक केले, विष्णू पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रकाश मोरुस्कर, सुरेश पाटील, महादेव मालव, यशवंत राणे, राखमाजी पाटील, आनंद मालव, लक्ष्मी जाधव, गोपाळ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.