🛑“गाव तेथे नवी एस.टी. धावणार, ५ वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेणार”.- परिवहन मत्री प्रताप सरनाईक.
🛑एस.टी. प्रवासात आता चिल्लरचे वांधे.- भाडेवाढीनंतर प्रवासी- वाहकांमध्ये वादविवाद.
मुंबई.- प्रतिनिधी
एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५ हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षांत २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती.
यामध्ये एस.टी.च्या सद्यस्थितीची परिस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली.
सध्या एस.टी. महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत.
त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील.
ही वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एस.टी.ला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला.
अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे प्रताप सरनाईक यांनी आभार मानले.
💥गाव तिथे एस.टी. …
मागेल त्याला बस फेरी..!
प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की,
दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन. २०२९ साली या २५ हजार बसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३० हजार बसेसचा ताफा एस.टी.कडे तयार असेल भविष्यात “गाव तिथे एस.टी. मागेल त्याला बस फेरी..!”
आपण देऊ शकतो आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एस.टी.वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे.
याबद्दल मी त्यांचा शतश: आभार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. दरम्यान, एस.टी.च्या भाडेवाढीवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
💥एस.टी. भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे.
मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही. मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात,
हा पोरखेळ आहे. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झाले की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे,
या शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.
🛑एस.टी. प्रवासात आता चिल्लरचे वांधे.- भाडेवाढीनंतर प्रवासी- वाहकांमध्ये वादविवाद.
गडचिरोली.- प्रतिनिधी.
एस.टी. बसेसच्या तिकीट दरात १४.९५ % टक्के वाढ करण्यात आली. परंतु, भाडेवाढीमुळे सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण होत असून,
पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद झाले.
२०१८ मध्ये ५ रुपयांच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली होती.
आताच्या भाडेवाढीत
११ रुपये,
१६ रुपये,
२३ रुपये
असे दर ठेवण्यात आले.
त्यातून प्रवासात सुटे पैसे देणे-घेण्यावर वाद होत आहेत.
पाचच्या पटीत दर आकारणी करा
भाडेवाढ करताना पूर्णांक व अपूर्णांकाचा, ग्रामीण प्रवाशांचा, सुट्या पैशांचा विचार करण्यात आला नाही.
🛑सुट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये वादविवाद होत आहेत.
त्यामुळे पाचच्या पटीत भाडे आकारणी करण्यात यावी,
अशी मागणी शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेने एका निवेदनाद्वारे परिवहन मंत्र्यांकडे केल्याची माहिती संघटनेचे मकरंद कुलकर्णी यांनी दिली.
सामाजिक माध्यमांवर व्हायरल मेसेज.
⭕उठा उठा वाहक बंधूंनो,
सकाळ झाली, एक-एक रुपया मागायची वेळ झाली.
⭕दिवाळीत दरवाढ झाली की,
एस.टी. कामगारांना बोनस दिला म्हणून तिकीट दर वाढले.
पण, आता
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ’ यांना द्यायला पैसे पाहिजेत म्हणून वाढ केली,
अशी कुजबूज प्रवासी करत आहेत.
⭕सर्व महिला वाहकांना नम्र विनंती.
⭕चिल्लर येत राहील,
जात राहील. एकमेकांवर राग काढून भांडण करू नका
प्रवाशांना भाडेवाढीचा फटका.
गडचिरोलीवरून नागपूरला जाण्यासाठी आता मोजा २९२ रुपये
राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) २५ जानेवारी २०२५ पासून १४.९५ % टक्के भाडेवाढ जाहीर केली.
त्यामुळे जनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास महागला आहे. याचा फटका जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना बसणार आहे.
पूर्वी नागपूरसाठी २५५ रुपये तिकीट होते.
आता २९२ रुपये मोजावे लागणार आहेत.
एस.टी. महामंडळाने लागू केलेली भाडेवाढ लागू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर याचा भार पडणार आहे.
एकीकडे एस.टी. महामंडळाने सवलतींचा वर्षाव केला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट अशा परिस्थितीत भाडेवाढीचा सामान्य प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे
मागील तीन वर्षांपासून एस.टी.च्या तिकीट वाढ झाली नव्हती. त्यामुळे एस.टी.चे चाक तोट्यात रुतले होते. यातून बाहेर काढण्यासाठी भाववाढ आवश्यक होती,
असे एस.टी. महामंडळाने स्पष्ट केले आहे. तिकीट दरात वाढ करतानाच चांगली सेवाही द्यावी लागणार आहे. प्रवाशांकडून चांगल्या सुविधांची अपेक्षा राहील.
💥सुट्टया पैशांसाठी वाढणार डोकेदुखी
भाडेवाढ विषम प्रमाणात झाल्याने आता ग्रामीण भागातील जनतेला तिकीट काढताना सुट्टया पैशांची अडचण येऊ शकते.
नवीन भाडेवाढ करताना ती सम प्रमाणात न झाल्याने सुट्टे पैसे जर प्रवाशांकडे नसतील तर वाहक आणि प्रवाशांत वाद होऊ शकतात. पूर्वी भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत केली जात होती. परंतु नवीन भाडेवाढ मात्र एक रुपयांच्या पटीत केली आहे.
त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना सुट्टे पैसे ठेवावे लागतील.
ठिकाणनिहाय तिकीट उदा..
ठिकाण पूर्वीचे नवीन
गडचिरोली- नागपूर २५५ २९२
गडचिरोली- चंद्रपूर १२५ १४२
गडचिरोली- चामोर्शी ५५ ६१
गडचिरोली- अहेरी १७५ २०२
गडचिरोली- देसाईगंज ८० ९०
गडचिरोली- सावली ४५ ५१
गडचिलोरी- मूल ६० ७१
गडचिरोली- धानोरा ५५ ६१