Homeकोंकण - ठाणेआता पत्रकारांना मिळणार २० हजार रुपये.- राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला...

आता पत्रकारांना मिळणार २० हजार रुपये.- राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर आले यश.🛑रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला.- उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट…👇

🛑आता पत्रकारांना मिळणार २० हजार रुपये.- राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर आले यश.
🛑रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला.- उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट…👇

मुंबई.- प्रतिनिधी

सेवानिवृत्तीनंतर पत्रकारांना मिळणारे मानधन ११ हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यासंदर्भात शासनाने घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती.राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज या फाईलला मंजुरी दिली असून, येत्या एप्रिलपासून पत्रकारांना २० हजार रुपये मानधन देण्याचे निश्चित केले आहे.
शासनाने यापूर्वी सेवानिवृत्त पत्रकार यांना मानधन वाढीची घोषणा केली होती. मात्र, ती अंमलात येण्यासाठी निधीची तरतूद केली जात नव्हती.राज्य मराठी पत्रकार संघासह अनेक संघटनांच्या मागणीनंतर तत्कालीन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दस्तावेज तयार करून तो वित्त व नियोजन विभागाकडे पाठवला होता. याला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, तरी निर्णय होऊ शकला नव्हता. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांच्या मानधनासाठी ५० कोटींची तरतूद केल्याचे जाहीर केले.
आता येत्या महिन्यापासून २०० पात्र पत्रकारांना या वाढीव मानधनाचा लाभ मिळेल. अनेक वेळा सरकार आश्वासन देते, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मात्र, यावेळी अजितदादांनी दिलेला शब्द पाळला आहे. याबद्दल राज्य मराठी पत्रकार संघाने व इतर पत्रकार संघांनी तसेच संघटनांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

🛑रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला.- उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट.- ९ फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उरण :- प्रतिनिधी.

Oplus_131072

रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या कोंबड्या या मृत पावत होत्या. त्यामुळे या कोबड्यांना तपासणीसाठी पाठवले असता कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबत अंडी देखील नष्ट करण्यात आली आहेत. तसेच या घटनेनंतर या परिसरातील चिकनची दुकाने ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यासोबत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आले आहे.

🟥उरण मधील चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या मागील काही दिवसापासून कोंबड्या मृत पावत होत्या. त्यामुळे शासनाच्या पशू पालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांच्या मृत्यू संशयास्पद वाटल्याने कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपाळ आणि पुणे येथे पाठविण्यात आल्याने त्यातील काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता चिरनेर परिसरातील 10 किलोमिटर अंतरावर सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गावात जाऊन पशू वैद्यकीय अधिकऱ्यानी अशा हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली असून पुढील कारवाई सुरू आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून गावातील 1 हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. 1 किलोमिटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलाय. या परिसरातील चिकनची दुकाने 9 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.