🛑आजरा तालुक्याकडे विशेष लक्ष देवून विकास साधणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ; वेळवट्टी येथे जाहीर नागरी सत्कार.
🛑इतरांची स्वप्नं पूर्ण करणं हे पुण्याचं काम – नाम. प्रकाश आबिटकर (राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका तीन विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे. तीनही आमदार महायुतीचे असले तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आजरा तालुक्याकडे विशेष लक्ष देऊन तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणावर कसा होईल याकडे कटाक्ष राहणार आहे. तसेच माझे नेतृत्व म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले. ते वेळवट्टी (ता. आजरा) येथे वेळवट्टी ग्रामस्थ व आजरा तालुका वासियांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा बँक संचालक प्रताप उर्फ भैया माने यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल व 9 व्यंदा मंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल वेळवट्टी ग्रामस्थ व आजरा तालुक्यातील जनता तसेच विविध संस्थांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक करताना जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई म्हणाले, ना. मुश्रीफ यांचे सर्वसामान्य माणसासाठी असणारे काम वाखाण्याजोगे आहे. आजरा तालुक्यातील आजरा व कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघासाठी ना. मुश्रीफ यांनी अडीच कोटींचा विकास निधी दिला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्यात अग्रेसर बनवण्याचे काम केले आहे. अडचणीतील साखर कारखाने चांगले चालावे यासाठी ना. मुश्रीफ यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. शासनाने संमती पीक कर्ज बंद केले आहे. यामुळे अनेक जणांची अडचण होणार आहे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा गरजेचा आहे. विकास सेवा संस्थांची सचिव भरती थांबली आहे, सचिव भरतीच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
ना. मुश्रीफ पुढे म्हणाले, झालेली विधानसभा निवडणूकिसाठी विरोधात अनेक चक्रव्ह्यूव्ह रचले गेले, मात्र सर्वसामान्य जनता, माता भगिनी पाठीशी असल्यामुळे विजय सुकर झाला. सर्वांनी जो प्रचंड विश्वास दाखवला आहे, या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करणार आहे. वैद्यकीय शिक्षण खात्यामध्ये गेल्या 14-15 महिन्यात चांगले काम केले आहे. या खात्याचे काम देशात सर्वोच्च करण्याचा मानस आहे. कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल दुरुस्तीचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. शेंडा पार्क येथील अकराशे बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल देखील आगामी वर्षभरात पूर्णत्वास जाईल. आगामी काळात राज्यात चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे रखडलेले प्रोत्साहन अनुदान त्रुटी दूर करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गट सचिवांच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यात येईल. एनसीडीसी मार्फत आजरा साखर कारखान्याला लवकरात लवकर कर्जपुरवठा करण्यात येईल. तसेच आगामी काळात जिल्हा बँक आजरा साखर कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. मे महिन्याच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मानस असून या निवडणुकांच्या अगोदर लाडक्या बहिणीचे 1500 वरून 2100 रुपये केले जातील. 2029 मध्ये लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. मतदार संघाच्या संकेत किमान 30 टक्के वाढ अपेक्षित असून महिला आरक्षण देखील लागू होण्याची शक्यता आहे. 2029 ची विधानसभा निवडणूक लढवून पुन्हा मंत्री होणार. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवून केंद्रात मंत्री होण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, सर्वसामान्य माणसाचे समाधान करणारे नेतृत्व म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहावे लागेल. आगामी काळात हसन मुश्रीफ यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंत धुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा बँक संचालक प्रताप उर्फ भैया माने, रणजीतसिंह पाटील, संतोष पाटील, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष एम. के. देसाई, संचालक विष्णुपंत केसरकर, शिवाजी नांदवडेकर, रचना होलम, मनीषा देसाई, नामदेव नार्वेकर, दीपक देसाई, रणजीत देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, जनता बँक संचालक विक्रमसिंह देसाई, आजरा तालुका संघ अध्यक्ष विठ्ठल देसाई, माजी उपसभापती शिरीष देसाई, राजू होलम, रवींद्र भाटले, संजय सावंत, जनार्दन बामणे, विजय देसाई, सरपंच मारुती पोवार, उपसरपंच शोभा माने, तहसीलदार समीर माने साहेब गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचालन केले.
🛑इतरांची स्वप्नं पूर्ण करणं हे पुण्याचं काम – नाम. प्रकाश आबिटकर –
आजरा.- प्रतिनिधी.

स्वतःची स्वप्नं पूर्ण करताना माणसाची अक्षरशः दमछाक होते. जीव मेटाकुटीला येतो. आयुष्यामध्ये स्वतःच्या घराचं स्वप्नं प्रत्येकजण पाहत असतो. स्वतःचं घर व्हावं यासाठी माणूस रात्रंदिवस झटत असतो. अशा परिस्थितीत एक खंबीर आधार देण्याचं काम जनता सहकारी गृहतारण संस्था नेहमीच करत आली आहे. दुस-याचं घर व्हावं अशी मनीषा बाळगून ते प्रत्यक्षात उतरविण्याचं पुण्याचं कार्य संस्था करीत आहे. असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी काढले. जनता गृहतारण संस्थेच्या स्थलांतरीत नवीन कार्यालयाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड विधानसभेचे नूतन आम. शिवाजीभाऊ पाटील व प्रमुख उपस्थितांमध्ये अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व सहायक निबंधक एस. बी. येजरे उपस्थित होते. संस्थाध्यक्ष मारूती मोरे अध्यक्षस्थानी होते.
आमदार शिवाजीभाऊ पाटील म्हणाले की सप्टेंबर २००१ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेची रौप्यमहात्सवाकडे वाटचाल सुरु असताना संस्थेला राज्य कार्यक्षेत्र व आयएसओ मानांकन मिळणे हे संस्थेच्या प्रगतीचे द्योतक आहे.
अशोकअण्णा चराटी यांनी सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार, काटकसरीचे धोरण, घरपोच, तत्पर व विनम्र सेवा यामुळे ‘माणसं जोडणारी संस्था’ म्हणून अल्पावधितच नावारूपाला आली आहे.
स्वागत व प्रास्ताविक प्रो. अशोक बाचुळकर यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन गणपतराव अरळगुंडकर यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. आनंद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमासाठी संचालक प्राचार्य अशोक सादळे, प्रो. तानाजी कावळे, शिवाजी पाटील, प्रो. संजय गायकवाड, प्रो. तानाजी पाटील, प्राचार्य बाळकृष्ण चौगले, डॉ. टी. एन. पवार, सो डॉ अंजजी देशपांड डॉ. अशोक दोरूगडे, डॉ. संजय पाटील, सौ. एल. डी. शेटे, सौ. नेहा पेडणेकर, महादेव मोरूस्कर, बी. एस. कडवाले, प्रा. विनाभव प्रा. मनोज देसाई, सुभाष डोंगरे, मैंनेजर मधुकर खबरे, प्रशासकीय अधिकारी, दत्तात्रय मोहिते, शिवाजी बिद्रे, डॉ. रवींद्र गुरव, सिद्धेश नाईक, सागर कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते.