🟥कोल्हापूरात कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून शेताकडे जाताना ट्रॅक्टर उलटला – ८ जण बुडाले तर तिघांना वाचविण्यात यश.
( पाचजण बेपत्ता असून बचावकार्य सुरू)
कोल्हापूर :- प्रतिनिधी
कोल्हापूर येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नदी- नाले ओसांडून वाहत सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अशातच शिरोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बस्तवड- अकिवाट मार्गावर कृष्णा नदीचा पूल ओलांडताना ट्रॅक्टर उलटल्याने आठजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. शिरोळ येथे तैनात असलेले एनडीआरएफचे पथकाने घटनास्थळी दाखल होत शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे.
🟥मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून जनजीवन विस्कळीत झाले. अशातच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंप सुरू करण्यासाठी गावातील काही जण ट्रॅक्टरमधून जात होते. हा ट्रॅक्टर बस्तवड- अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात उलटला. यामुळे या ट्रॅक्टरमध्ये बसलेले आठही लोक पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, अजूनही पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.