गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीपात्रात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना gadargaon Hiran kaisi Nadi Patra
आजरा.- प्रतिनिधी.
सुळे ता. आजरा येथील अरुण बचाराम कटाळे (वय 55 वर्षे) उदय बचाराम कटाळे (वय 52 वर्षे) व जयप्रकाश अरुण कटाळे (वय तेरा वर्षे) यांचा गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली सुदैवाने यामध्ये ऋग्वेद उदय कटाळे हा बचावला. यात्रा कालावधीत सदर प्रकार घडल्याने सुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की यात्रेनिमित्त आलेले हे कटाळे कुटुंबीय कपडे धुण्यासाठी व आंघोळी करता गजरगाव येथील बंधारा नदीपात्रामध्ये उतरले होते. यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून जयप्रकाश अरुण कटाळे यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.