काजूबागेत काजू गोळा करण्यासाठी गेलेला हाजगोळी ता. चंदगडतील शेतकऱ्याचा.- मृतदेह तूर्केवाडी- जंगमहट्टी दरम्यानच्या हांजहोळ नदीवरील बंधाऱ्यात सापडला. ( घातपात झाल्याचा संशय होतोय व्यक्त )
चंदगड.- प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे काजूबागेत काजू गोळा करण्यासाठी गेलेला शेतकऱ्याचा मंगळवार दि.२६ रोजी काजूबागेत काजू गोळा करण्यासाठी गेलेला शेतकरी घरी आलाच नाही. अखेर शुक्रवार दि.२९ रोजी बेपत्ता शेतकऱ्यांचा मृतदेह तूर्केवाडी- जंगमहट्टी दरम्यानच्या हांजहोळ नदीवरील बंधाऱ्यात सापडला.वसंत पांडुरंग पाटील (वय ६५, रा.हाजगोळी) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. पाटील यांची दुचाकीही गायब झाल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत असून लवकरच याबाबतचा खुलासा होईल असं चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी वसंत पाटील हे नेहमीप्रमाणे काजू गोळा करण्यासाठी माडवळे-हाजगोळी रस्त्याला लागून असलेल्या आपल्या काजूच्या बागेत गेले होते. रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी न आल्याने पत्नी व नातेवाइकांनी त्यांचा शोध घेत बाग गाठली. त्यावेळी काजूबागेत दुचाकीसह तेही गायब होते.मात्र, घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा व वसंत यांचे पडलेले चप्पल यावरून कुणीतरी हल्ला करून त्यांना गायब केल्याच्या संशयावरून पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता.अखेर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास तुर्केवाडी – जंगमहट्टी दरम्यानच्या बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह सापडला आहे.


