आरदाळात हारण्या बैलाला वहिल्या वाढदिवसाच्या बक्कळ शुभेच्छा…सचिन पावलेना – पावलाय अनोखा हरण्या बैल ( आणोखा वाढदिवस )
🛑मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
“मराठा समाजातील भावांनो,टोकाचे पाऊल उचलू नका”.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी.

धावपळीच्या व बदलत्या डिजिटल युगात आजही पाळीव प्राण्यांवर मनापासून प्रेम करणारी माणसं आजही आहेत. गाव तसं लहान पण माणुसकीने महान आरदाळ ता. आजरा येथील सचिन पावले यांच्या हरण्या नावाच्या बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सद्यस्थितीत रोज कुणाचा ना कुणाचा वाढदिवस साजरे करीत असतोचं त्यात काही नवं राहिलं नाही…पण मंडळी आज एक आगळावेगळा वाढदिवस साजरा होत आहे. तो म्हणजे एका पाड्याचा….त्याच नांव आहे हारण्या. हारण्या आज बरोबर एक वर्षाचा झाला…आणि आज त्याचा पहिलावहीला वाढदिवस. काळेभोर देखणे डोळे… दोन्हीं बाजूस फडफडते टोकदार कान.. पांढरी शुभ्र भरजरी अंगकांती…
कोवळ्या वयाच्या वाढत्या अंगात दिसणारा तरूणपणाचा रुबाबदार बाज…देखण्या साजिऱ्या गोजिऱ्या रूपाचा साज…पांढऱ्याखड ढगाचा गोळा अवचित हिरव्यागार रानावर आवतरावा तसा हारण्या..
बघता क्षणी भान हरपावं…जीव लावावा, जीव ओवाळून टाकावा असा गुणी गोंडस रूपाचा हारण्या आजपासून बरोबर एक सालापूर्वी जन्माला आला…आरदाळ गावचे सधन शेतकरी सचिन पावले यांनी ह्या पाड्याला आपल्या लेकरावानी जीव लावून पोसलाय..घासातला घास भरवून,चारापाणी देऊन वाढवलाय…दररोज पाठीवरून मायेचा हात फिरवत त्याची काळजी घेतलीय..त्याला बापाची माया दिली…आणि आज हे मायेचं लेकरू एक वर्षाचं झालं.. म्हणून आज मोठ्या हौसेनं त्याचा पहिलावहिला थाटामाटात वाढदिवस साजरा केला जात आहे…मुक्या जनावाराची अशी हौसमौज करावी, लेकरावाणी अस्सल माया लावावी ती फक्त शेतकरीराजानचं…हारण्याला पहिल्यावहिल्या वाढदिवसाच्या बैलगाडी भरून बक्कळ शुभेच्छा…असाच मोठा हो…ताकदवान हो…आणि रुबाबात राहा…मंडळी
बळीराजाच्या या लेकराला हारण्याला तुम्ही बी शुभेच्छा देताय नव्ह.. असं एक सुराणा ग्रामस्थांनी या वाढदिवसात सहभाग नोंदवून या हारण्या बैलाला शुभेच्छा दिल्या…
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील
“मराठा समाजातील भावांनो,टोकाचे पाऊल उचलू नका”.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन.
मुंबई.- प्रतिनिधी.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे सांगितले.
ठाणे येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.तसेचमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येच्या घटना ह्या दुर्देवी आणि दु:खदायक, वेदनादायी आहेत. माझी विनंती आहे की समाजातल्या माझ्या भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका. बंधूंनो आपला जीव लाख मोलाचा आहे. आपल्या कुटुंबाचा, आई वडिलांचा, मुला बाळांचा विचार करा, अशी भावनिक साद देतानाच राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली असून १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. ही दिलासादायक बाब असून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आधार देणारी आहे. राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत वस्तुस्थितीदर्शक बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मराठवाड्यात जुन्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. खोलवर जाऊन नोंदी तपासण्याचे काम समितीमार्फत सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आरक्षण मिळेपर्यंत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सागितले. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
नवरात्रोत्सवानिमित्त ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या आई भवानी मातेचे मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब दर्शन घेत पूजा केली. यावेळी राज्यावरील, बळीराजावरील संकट दूर करून राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असं साकडं घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
