Homeकोंकण - ठाणे'मी आमदाराची पत्नी आहे.- एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते ते मला चांगलं...

‘मी आमदाराची पत्नी आहे.- एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते ते मला चांगलं माहीत आहे’.- करुणा शर्मा मुंडे.

मी आमदाराची पत्नी आहे.- एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते ते मला चांगलं माहीत आहे’.- करुणा शर्मा मुंडे.

मुंबई :- प्रतिनिधी. २५

राज्यातील आमदारांना मुंबईत घरं देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर चहूकडून टीकेची झोड उठली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी यावर मौन बाळगलं असलं तरी सामाजिक क्षेत्रातून या निर्णयाला विरोध होत आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी देखील सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातील आमदारांसाठी मुंबईतील गोरेगाव इथं ३०० घरं बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी गुरुवारी विधानसभेत केली होती. याचे तीव्र पडसाद सर्वसामान्य जनतेमध्ये उमटत आहेत. सोशल मीडियात त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे.याच पार्श्वभूमीवर अलीकडंच राजकारणात सक्रिय झालेल्या व नव्या पक्षाची घोषणा करणाऱ्या यांनी आपली भूमिका मांडली. कोल्हापुरात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. ‘काही दिवसांपूर्वीच आमदारांच्या मानधनात वाढ झालीय. त्यांच्या कर्मचाऱ्यांचाही पगारही वाढवण्यात आलाय आणि आता आमदारांना घर बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना गोरगरीब जनतेनं निवडून मुख्यमंत्री बनवलंय आणि ते आमदारांना घर देत आहेत, अशी उद्विग्नता करुणा मुंडे यांनी व्यक्त केली. ‘मुंबईतील आझाद मैदानात आजही आरोग्य सेविकांपासून एसटी कर्मचारी, ग्रामीण भागांत तळागाळात काम करणारे अनेक शिक्षक बेमुदत उपोषण करत आहेत. अवघ्या १० ते १२ हजार रुपयांच्या पगारासाठी त्यांना उपोषण करावं लागत आहे. त्यांचा साधा आवाजही मुख्यमंत्र्यांना ऐकू जात नाही, हे भयंकर आहे.
मी स्वत: एका आमदाराची पत्नी आहे. माझा नवरा १५ वर्षांपासून आमदार आहे. एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते हे मला चांगलं माहीत आहे. आज अनेक आमदारांकडं कोट्यवधींची आणि अब्जावधींची प्रॉपर्टी आहे. असं असताना त्यांना घरं दिली जात आहेत. उद्धव ठाकरे हे आमदारांची घरं भरण्यासाठी मुख्यमंत्री झालेत की गोरगरीब लोकांची दु:ख दूर करण्यासाठी,’ असा बोचरा सवालही त्यांनी केला.
‘महाराष्ट्रातील शिक्षकांचा आठ महिन्यांपासून पगार झालेला नाही. त्यांचा पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, पण आमदारांसाठी पैसा आहे. दोन-दोन वर्षांची मुलं घरी सोडून महिला शिक्षिका, आरोग्य सेविका मुंबईत आंदोलनासाठी आल्या आहेत. त्यांचा काहीतरी विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. त्यांनी आझाद मैदानात जायला हवं, असं त्या म्हणाल्या. ‘सरकारनं आमदारांना घरं देण्याचा निर्णय कायम ठेवला, त्यांचं मानधन वाढवलं व त्यांच्या नोकरांचा पगार वाढला तर मी संपूर्ण राज्यात उग्र आंदोलन करेन, असा इशारा देतानाच, आधी गोरगरिबांना दिलासा द्या, पगार द्या. मग आमदारांना जे द्यायचं ते द्या, असं त्यांनी सरकारला सुनावलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.