माजी नगरसेवक अशोक चराटी पक्षाचा झेंडा खाली ठेवणार का? ना. आबिटकर यांच्या सोबत जाणार ? ( प्रश्न समीतीचा – पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका..)
आजरा.- प्रतिनिधी.

डोळ्यासमोर असलेल्या आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीने पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधारी मंडळी व चार दिवसांपूर्वी नाम. प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आजरा नगरपंचायत निवडणुक ना. श्री आबिटकर यांच्या सोबत लढणार या श्री चराटी यांच्या वक्तव्यावर अन्याय निवारण समितीने पत्रकार परिषदेत घेत जोरदार टीका केली आहे.
यावेळी बोलताना समीतीचे अध्यक्ष परशुराम बामणे म्हणाले.
मतदार याद्यातील गैरप्रकारावर कारवाईची मागणी :- आजरा नगरपंचायत क्षेत्रातील पर गावाहुन येऊन आजरा येथे वास्तव्यास नसलेल्या मतदारांची नावे वगळणेची मागणी समितीने केली आहे. याबाबत दि. २०/०६/२०२५ रोजी ना. पालकमंत्री नाम. प्रकाश अबिटकर यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी आजरा. तहसिलदार समीर माने व मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांना पालकमंत्री यांनी तात्काळ कार्यवाही करणे बाबत सूचित केले. ८ दिवस वाट पाहू नाहीतर निवडणूक विभाग तहसिल कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणेचे नियोजित आहे. सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामीण भागातील मतदार दोन्हीकडे नोंद केलेली आहे. ते रद्द करणारच.
समाजकार्य आणि निवडणुक सहभाग.
आजपर्यंत अन्याय निवारण समितीने सामाजिक व वैयक्तिक समस्यांवर कार्य करत नगरपंचायत क्षेत्रात लोकहिताचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही सर्व मतदारांचा विश्वास संपादन करत निवडणूकीत सक्रिय सहभाग घेणार असल्याचे अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले आहे.
राजकिय गोंधळावर प्रश्नचिन्ह :
समितीच्या आवाहनानंतर, माजी नगरसेवक अशोकआण्णा चराटी यांनी आदर्श बालक मंदिर शाळेच्या नुतन वास्तू उद्घाटन प्रसंगी नाम श्री.आबिटकर यांना बोलावून त्याच मंचावर नगरपंचायत निवडणूक त्यांच्या झेंड्याखाली लढवणार असल्याचे जाहिर केले. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो. की, ते आपल्या पक्षाचा झेंडा खाली ठेवणार आहेत का? आणि अबिटकर यांच्या सोबत जाणार आहेत का? की ना. आबिटकर आपला झेंडा यांना देणार का? आणि त्यांना झेंडा देऊन निष्ठने आसणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करणार का ? विधान सभेच्या निवडणूकीत अन्याय निवारण समिती ताकतीने आणि शक्तीने आबिटकर आमदार व्हावे. म्हणून काम करत होतील आमदारांची निंदा नालस्ती करुन त्यांना सोडचिठ्ठी देण्यात मग्न होती. परंतु नागरिकांचा होरा बघीतला आणि पुन्हा आमदार श्री आबिटकर यांना मदत कराण्यासाठी सहभागी झाली पण नुसताच सहभाग होता.
बाकी शुन्य. बदनामीचा डाव.
श्री.चराटी यांचे नगरपंचायतीतील कामकाज आता जनतेसमोर आले आहे. त्यामुळे आता श्री चराटी ना. आबिटकर यांच्या झेंड्याखाली जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ना. आबिटकर यांनी नी नगरपंचायत मंजूर करून आणली पण पहिल्याच निवडणूकीत त्यांना विचारायच्या आधी आपण पॅनेल उभा केले त्यामध्ये ना.आबिटकर यांना स्थान दिले नाही. त्यामुळे ना. अबिटकर नेतृत्याखाली तिसरी आघाडी निवडणूकीत उतरली. आता असा झेंड्याचा डाव टाकुन ना. आबिटकर प्रतिमा मलीन करण्याचा हेतु असून, हा प्रकार जनतेने ओळखावा.
दि. १५/०६/२०२५ आजरा नगरपंचायतीच्या पार्श्वभुमीवर प्रथम रणशिंग फुंकणाऱ्या अन्याय निवारण समितीनंतर आता सत्ताधारी मंडळीही निवडणूक प्रचारात आम्ही कामे केली अशी पुन्हा एकदा जाहिर वक्तव्ये केली जात आहेत. मात्र, ही कामे करताना निधी कोणी उपलब्ध करून दिला याचा उल्लेख मुद्दाम टाळण्यात आला आहे. सत्ताधारी पक्ष म्हणतो की, निवडणूकीपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील. पण प्रत्यक्षात सुरु असलेल्या कामांमध्ये अनेक त्रुटी, दिरंगाई, आणि अनागोंदी परिस्थिती आहे. कामांची गुणवत्ता तपासली जात नाही आणि स्थानिक प्रशासन व सत्ताधारी नेते या त्रुटीवर डोळे झाक करत आहेत. ही दुर्लक्ष करण्यामागचं गुपित काय आहे? असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत.
अन्याय निवारण समितीने यावर तीव्र निषेध नोंदवून, सत्ताधाऱ्यांकडून कामाच्या गुणवत्तेची व पारदर्शकतेची मागणी केली आहे. आजरा नगरपंचायत मधील सुजाण मतदारांनी हे प्रश्न मतदान करताना डोळ्यासमोर ठेवावेत, असे आवाहन समितीने केले आहे. यावेळी उपाध्यक्ष विजय थोरवत, गौरव देशपांडे, दयानंद भोपळे, जोतिबा आजगेकर सह समीतीचे सदस्य उपस्थित होते.