Homeकोंकण - ठाणेकोल्हापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील धबधब्यात.- सेल्फी काढण्याच्या नादात धबधब्याच्या प्रवाहात तरूण गेला...

कोल्हापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील धबधब्यात.- सेल्फी काढण्याच्या नादात धबधब्याच्या प्रवाहात तरूण गेला वाहून..🛑कंबर-पाठ खूप दुखते? रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधात….. मिक्स करा रोज प्या.

🟥कोल्हापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील धबधब्यात.- सेल्फी काढण्याच्या नादात धबधब्याच्या प्रवाहात तरूण गेला वाहून..
🛑कंबर-पाठ खूप दुखते? रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधात….. मिक्स करा रोज प्या.

💥कोल्हापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील धबधब्यात.- सेल्फी काढण्याच्या नादात धबधब्याच्या प्रवाहात तरूण गेला वाहून..

कोल्हापूर :- प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. काही अति उत्साही पर्यटकांमुळे या धबधब्यांच्या ठिकाणी अपघात घडताना पाहायला मिळतात. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे एक पर्यटकाने सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडला. तो वाहून जात असताना दैव बलवत्तर म्हणून तेथील पर्यटकांनी त्याला वाचवलं आहे.

🟥गेल्या आठवड्याभरापासून पश्चिम घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून यामुळे येथील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा सुद्धा प्रवाहित झाला आहे. या धबधब्याला प्रवाह जास्त आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येथे गर्दी करत असतात. काहीजण धबधब्यात उतरून हुल्लडबाजी करताना देखील पाहायला मिळतात. काल या धबधब्यात एका पर्यटकाने सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरला आणि यावेळी त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि प्रवाहात वाहून जाऊ लागला.

🔴याचवेळी येथील काही पर्यटक त्वरित त्या तरुणाच्या मदतीसाठी पुढे सरसावले. मात्र पाण्याला प्रवाह असल्याने आणि बचावासाठी कोणतेही यंत्रसामग्री नसल्याने वाहून जाणाऱ्या व्यक्तीस बचाव करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. मात्र दैव बलवत्तर म्हणून या पर्यटकांनी मोठ्या अडचणीत वाहून जाणाऱ्या त्या तरुणासा बाहेर काढलं. मात्र ज्या मोबाईल मध्ये तो सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरला होता, तो मोबाईल वाहून गेला. धबधब्यांना प्रवाह जास्त असल्याने पर्यटकांनी स्वतःचा जीव सांभाळून पर्यटन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

🛑कंबर-पाठ खूप दुखते? रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधात….. मिक्स करा रोज प्या.

आरोग्य- घरचा डॉक्टर..

थोडं काम केलं की लगेच अशक्तपणा येतो, थकल्यासारखं वाटतं (Tiredness Solution) अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. शरीरात रक्ताची कमतरता, हाडांमध्ये वेदना होतात असे त्रास प्रत्येकालाच उद्भवतात. (Health Tips) जर तुम्हालाही फार चक्कर येत असतील आणि भूक लागत नसेल तर तुम्हाला कमकुवतपणाचा सामना करावा लागू शकतो. (How to boost Stamina) कमी वयातच तुम्हाला कमकुवतपणा, थकवा जाणवत असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

शरीर निरोगी राहण्यासाठी ताकद असणं फार महत्वाचे असते. ज्यामुळे तुमची इम्यूनिटी (Immunity) चांगली राहते आणि आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. जर तुमचं वजन कमी जास्त होत असेल आणि अनेक प्रयत्नांनंतरही वजन कमी होत नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. योग गुरू बाबा रामदेव यांनी शरीराची ताकद वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे थकवा, कमकुवतपणा कमी होईल.

💥ताकद वाढवण्याचे ड्रिंक कसे तयार करायचे…?

दूध, केळी, खजूर, शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, पांढरी मुसली, शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, सफेद मुसली, काळ्या कौच बिया हे साहित्य लागेल. सगळ्यात आधी एका कपामध्ये दूध घ्या. थंड किंवा गरम कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता. दूधात केळी आणि खजूर घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात शतावरी, अश्वगंधा, पांढरी मुसली आणि कौंच बीयांची पावडर घालून एकत्र करा. नियमित हे दूध प्यायल्याने तब्येतीत सुधारणा दिसून येईल.

💥केळी आणि खजूर
बाबा रामदेव यांनी केळी आणि खजूर ताकद वाढवण्याचं एक उत्तम औषध असल्याचे सांगितले आहे. हे दोन्ही पदार्थ वजन वाढवण्यासाठी आणि रक्ताची कमतरता दूर करण्याासाठी ओळखले जातात. यात व्हिटामीन्स, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे पोषक तत्व असतात.

खजूरात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्न यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यांचे वजन कमी आहे त्यांच्यासाठी हा घरगुती उपाय परिणामकारक असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे. रोज हे हेल्दी ड्रिंक प्यायल्यान वजन वाढते आणि पर्सनॅलिटीही चांगली राहते.

रामदेव बाबांच्यामते हे ड्रिंक प्यायल्याने अशा लोकांना सगळ्यात जास्त फायदा होतो ज्यांची इम्यूनिटी कमकुवत असते. जर तुम्हीही वारंवार आजारी पडत असाल तर हा उपाय करून पाहा. हे मिश्रण शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, सफेद मुसली यांसारक्या पदार्थांनी बनवले जाते. रामदेव बाबांच्यामते हे मिश्रण प्यायल्याने शरीराची ताकद वाढते…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.