Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजंगली जनावरांपासून होणाऱ्या पीक नुकसानी बाबत.- ना. आबिटकर यांना निवेदन.🛑मृत्यूंजयकार शिवाजीराव सावंत...

जंगली जनावरांपासून होणाऱ्या पीक नुकसानी बाबत.- ना. आबिटकर यांना निवेदन.🛑मृत्यूंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा.- डॉक्टरांची नेमणूक करावी.- उबाठा सेनेचे निवेदन.🛑राष्ट्रीय महामार्गाचा गलथान कारभार.- गटर्स नसल्याने – रस्त्यावरून पाणी घरात धनगरमोळा पाण्यात.

🛑जंगली जनावरांपासून होणाऱ्या पीक नुकसानी बाबत.- ना. आबिटकर यांना निवेदन.
🛑मृत्यूंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा.- डॉक्टरांची नेमणूक करावी.- उबाठा सेनेचे निवेदन.
🛑राष्ट्रीय महामार्गाचा गलथान कारभार.- गटर्स नसल्याने – रस्त्यावरून पाणी घरात धनगरमोळा पाण्यात.

🛑जंगली जनावरांपासून होणाऱ्या पीक नुकसानी बाबत.- ना. आबिटकर यांना निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

जंगली जनावरांपासून होणाऱ्या पीक नुकसानी बाबत ना. प्रकाश आबिटकर यांना गवसे पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा तालुका हा पश्चिम घाटामधील जंगल भागातील निसर्गरम्य परिपूर्ण असलेला तालुका आहे.


सदर तालुक्यामधील शेतकरी हा आपल्या अर्थकारणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्या भागामध्ये शैक्षणिक संस्था कमी असल्यामुळे अधिकाधिक घेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत. येथे ऊस भात, नाचणी, भुईमूग मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते.

सदर तालुका हा डोंगराळ व जंगल भागात असल्यामुळे येथे गवे रेडे, टस्कर हत्तीं. तसेच रानडुक्कर, बिबट्या व अलीकडेच आढळलेले पट्टेरी वाघ या प्राण्यांचे वास्तव्य येथे आहे. आपला पश्चिम घाट हा पुनेस्कोचाऊ वर्ल्ड हेरिटेज साईटवा एक भाग असून आपल्या भागाला जगातील हॉटस्ट हॉटस्पॉटचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे येथील जंगलांचे, निसर्गाचे संरक्षण करणे ही शासन प्रशासनाची जबाबदारी आहे. भारतीय संविधानाच्या कलम 48(a) व 51(a) नुसार भारतातील वन्य प्राण्याचे वनस्पतींचे, निसर्गाचे रक्षण करणे ही राज्याच्या जबाबदारीपैकी एक महत्त्वाची जबाबदारी सांगितलेली आहे. वन्यप्राणी व जंगलांचे, त्यातील संपत्तीचे संरक्षण करणे हे संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेले आहे. असे असले तरीही निसर्गाचा एक भाग असलेला मनुष्य देखील एक प्राणी असून त्यालाही जगण्याचा अधिकार हा भारतीय संविधानात कलम २१ नुसार मूलभूत अधिकारांमध्ये नमूद केलेला आहे. त्यामुळे या भागातील राहणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करणे हेही सरकारचे कर्तव्य आहे. शेतकन्यांनी जंगलाच्या हद्दी जवळ असणा-या शेती कसण्याचे पूर्णपणे बंद केलेले आहे. जे शेतकरी अशा भागात शेती करतात त्यांना त्यांच्या शेतामध्येच रात्रंदिवस पहारा द्यावा लागतो. निश्चितच हे अतिशय त्रासदायक आहे

याशिवाय महत्त्वाचे असे की या प्राण्यांच्या साठी आपल्या भागात जंगल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही सदर प्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन शेतीचे नुकसान करत असतात. याशिवाय ते कधी कधी शेतकऱ्यांवर, येणा-या जाणाऱ्या प्रवाशांवर हल्ला करून त्यांना जखमी करत असतात अनेकदा अशा हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा मृत्यूही झालेला आहे. एखाद्या शेतकऱ्याने जंगलामध्ये जाऊन एखादे झाड तोडले अथवा एखाद्या प्राण्याची हत्या केली तर त्या शेतकऱ्याला शिक्षा केली तर. मग एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात येऊन एखाद्या वन्य प्राण्याने हल्ला करून शेतकऱ्याचा जीव घेतला तर त्याला जबाबदार कुणाला मानावे? मग यासाठी संबंधित विभागाचे शासकीय कर्मचारी तसेच जनतेच्या मतांवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत का?

याशिवाय शेतकन्यांना शेतमालाचे नुकसान केल्यानंतर जी नुकसान भरपाई दिली जाते ती अगदीच किरकोळ असते. तेवढ्या किमतीत शेतकऱ्यांच्या शेतात नांगरणी सुद्धा होऊ शकत नाही. शेतकन्याची झालेली ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने कशी होईल तर यासाठी IRMA (income risk management act) नावाचा कायदा जो भारताबाहेर इतर देशांमध्ये लागू आहे तसाच कायदा भारतात सुद्धा लागू करावा आणि त्यानुसार शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान झाल्यास त्याला नुकसान भरपाई मिळावी. असे झाल्यास शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा होणारा त्रास झाला तरी तो कमी प्रमाणात होईल. तरी यावर आपण लवकरात लवकर काही उपाययोजना कराव्यात आज रोजी वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानाची ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये नुकसान ग्रस्त शेतकरी गोविंद पाटील, सुनील तांबेकर, यशवंत पाटील, वसंत पाटील, घाटकरवाडी, गवसे महादेव पाटील, हत्ती ने जयवंत डेळेकर, राजाराम पाटील, निवृत्ती यादव, दिपक यादव यांचे शेतातील
ऊस मुळा सह उखडून फस्त केला आहे. वनपाल निकम, वनरक्षक कदम यांनी वन विभागाच्या वतीने पाहणी केली आहे.‌

🛑मृत्यूंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा.- डॉक्टरांची नेमणूक करावी.- उबाठा सेनेचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मृत्यूंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे नवीन डायलेसीस सेंटर चालू करणेत आले आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन. या सेंटरमध्ये अनेक रुग्ण डायलेसीस करुन घेत आहेत. पण हे डायलेसीस करताना जर एखादा रुग्ण अस्वस्थ झाला किंवा त्याचे काही बरेवाईट झाले तर त्या सेंटरमध्ये त्यावर उपचार करणारा एम.डी मेडीसीन डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुढे जाऊन तो रुग्ण दगवण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरुपी एम. डी मेडीसीन डॉक्टर नेमण्यात यावा त्याच बरोबर या रुग्णालयात अनेक ग्रामीण भागातून लहान मुले आजारी पडल्यावर त्यांचे पालक उपचारांसाठी या रुग्णालयात येतात. पण या ठिकाणी कायमस्वरुपी बालरोगतज्ञ नसल्यामुळे या बालकांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात यावे लागते हे गरीब कुटुंबाना परवडणारे नाही. डॉक्टर कायमस्वरुपी उपलब्ध नसलेने लहान मुलांचे अतोनात हाल होत आहेत. तरी या ठिकाणी कायमस्वरुपी बालरोगतज्ञ नेमणूक करावी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर ता. प्रमुख युवराज पोवार, महेश पाटील युवा सेना
चंद्रकांत व्हरकटे, अनपाल तकिलदार रवि सावंत, पांडू केसरकर, बबन चौगुले सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

🛑राष्ट्रीय महामार्गाचा गलथान कारभार.- गटर्स नसल्याने – रस्त्यावरून पाणी घरात धनगरमोळा पाण्यात.

आजरा.- प्रतिनिधी

Oplus_131072

धनगरमोळा ता. आजरा येथील राष्ट्रीय महामार्गाचा गलथान कारभारा मुळे गटर्स नसल्याने मुसळधार चालू असलेल्या पावसाचे पाणी रस्त्यावरून पाणी घरात घुसले आहे. त्यामुळे सदर घरांची पडझड होण्याची शक्यता आहे. या घरासमोरून गटार न काढल्या मुळे पाणी घरात शिरले आहे. यामध्ये
यशवंत नाना जाधव, योगेश आनंदा जाधव, चंद्रकांत शंकर जाधव, धोंडिबा शंकर जाधव, बाळकू बारदेस्कर,अंद्रू बारदेस्कर
आनंदा शेटगे यांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे. तरी लवकरच संबंधित विभागाने पाहणी करून राष्ट्रीय महामार्गाकडून यापुढे होणाऱ्या पावसात घर पाण्याखाली जाऊ नये. व नुकसान होऊ नये यासाठी या ठिकाणी गटर्स मारून मिळावी व झालेली नुकसान भरपाई राष्ट्रीय महामार्गाकडून देण्यात यावी.

Oplus_131072

अशी मागणी संबंधित घरमालक शेतकऱ्यांच्याकडून होत आहे. एकीकडे मागील २०२४ अतिवृष्टी काळात घराची झालेली पडझड त्याची नुकसान भरपाई अद्याप शासनाने दिलेली नाही. यामध्येच वरून ही पाऊस व पावसाने रस्त्यावरील पाणीदेखील घरात यामुळे घरात राहायचं की नाही. शासनाने सांगावे व प्रत्यक्ष पाहणी करून मार्ग काढावा. शेतकऱ्यांचे मत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.