Homeकोंकण - ठाणेप्रवाशांना दिलासा..करुळ घाट मार्ग वाहतूकीसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता.

प्रवाशांना दिलासा..करुळ घाट मार्ग वाहतूकीसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता.

करूळ घाटाचे काम युध्दपातळीवर काम सुरू

वैभववाडी :- प्रतिनिधी. २५

बऱ्याच दिवसांपासून वाहतूकीसाठी बंद असलेला करुळ घाटमार्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली होती. मात्र याठिकाणी घाटमार्गात पडलेल्या भेगा अधिकच रुंदावत गेल्यामुळे २२ जुलै पासून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद केली आहे.जिल्ह्यात पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः कहर माजविला आहे. या मुसळधार पावसामुळे दोन आठवड्यापूर्वी करुळ घाटात रस्त्याच्या दरीकडील बाजूस असलेल्या मोरीचा कठडा ढासळला. त्यामुळे दुरूस्तीसाठी करुळ घाट मार्ग २६ जुलै पर्यंत बंद करण्यात आला आहे.

दरम्यान करुळ घाटात रात्रंदिवस घाट दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर काम सुरू असून येत्या काही दिवसांत घाटमार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भुईबावडा घाट रस्त्यात भेगा अधिकच रुंदावल्याने कधीही याठिकाणी भूस्खलन होण्याची दाट शक्यता असल्याने सध्या तरी भुईबावडा घाट मार्गे वाहतूक पुर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.

Previous article
Next article
शेत पिकांचे ताबडतोड पंचनामे करून.- नुकसान भरपाई मिळावी. मनसेची मागणी. आजरा. प्रतिनिधी. अती पावसाने पिकाचे झालेले नुकसान व पडझड झालेल्या घरांची पंचनामे करून ताबडतोड नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आजरा मनसे यांनी आजरा तहसिल यांना दिले आहे. दिलेला निवेदनात म्हटले आहे की दि. २१,२२,२३ रोजी तीन दिवस प्रचंड अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये शेतामध्ये ओढे नदी वाहून जाऊन फार मोठे नुकसान झाले आहे तरी नुकसान भरपाई देतांना फक्त पिकाची नुकसान भरपाई न देता वाहून आलेले ओढे नदी यामधील दगड रेती बाजूला करण्यासाठी शेतीची मशागत पुन्हा सुरळीत होण्यासाठी लागणारा खर्च नुकसान भरपाई मध्ये घेण्यात यावा व सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच सदर पंचनामे अधिकारी यांनी प्रत्यक्षात शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे व लाभार्थी यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आजरा मनसे तहसीलदार कार्यालय आजरा समोर जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात येतील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मनसे ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, परशराम बामने जनहित कक्ष ग्रामीण जिल्हाअध्यक्ष, महिला आघाडी उपजिल्हाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष सरिता सावंत, उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, प्रकाश कांबळे, प्रमोदिनी देसाई, तेजस्विनी देसाई, वसंत घाटगे,अरँचना वंजारी वैभव येसणे,संतोष वाघराळकर, वसंत पालकर सह मनसैनिकांच्या सह्या आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.