आंबोली.प्रतिनिधी. दि.२३.
मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ रात्री दरड व माती कोसळली होती. वाहतुकीस महत्त्वाचा मार्ग असल्याने दरड व माती हटवून हा मार्ग वाहतुकीस मोकळा केला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मुसळधार पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली धबधब्यानजीक रस्त्यावर दरड व मातीचा भाग कोसळला होता. त्यामुळे सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग पूर्णतः ठप्प झाला होता. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच महत्वाचा मार्ग असल्याने याची दखल घेत दरड व माती हटवून हा मार्ग वाहतुकीस पूर्ववत केला आहे.