Homeकोंकण - ठाणेलाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थ्यांना वगळले.- या 'निकषात' बसणाऱ्या महिला योजनेतून...

लाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थ्यांना वगळले.- या ‘निकषात’ बसणाऱ्या महिला योजनेतून बाहेर!..कोणती बहीण बाहेर.👇🟥आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसोबतच.- आमची वज्रमुठ मजबूत.- आँपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या ९ खासदारांची पत्रकार परिषद घेत एकमुखी ग्वाही.

🟥लाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थ्यांना वगळले.- या ‘निकषात’ बसणाऱ्या महिला योजनेतून बाहेर!..कोणती बहीण बाहेर.👇
🟥आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसोबतच.- आमची वज्रमुठ मजबूत.- आँपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या ९ खासदारांची पत्रकार परिषद घेत एकमुखी ग्वाही.

मुंबई – प्रतिनिधी.

Oplus_0

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती एक्सवर दिली आहे. या नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत. जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात दिले जात होते. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.

🟥या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही

आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.

🟥आम्ही उध्दव ठाकरेंसोबतच.- आमची वज्रमुठ मजबूत.- आँपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या ९ खासदारांची पत्रकार परिषद घेत एकमुखी ग्वाही.

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाकरे गटाचे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने आमच्याकडे येणार आहेत, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. एकूण नऊ खासदार आमच्या संपर्कात आहेत, असं सामंत यांनी सांगितल्यानंतर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वच्या सर्व खासदारांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत. आम्ही कोणत्याही वेगळ्या पक्षात जाणार नाही, अशी ग्वाही दिली. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, अरविंद सावंत, अनिल देशाई, संजय जाधव हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

🟥या पत्रकार परिषदेला अरविंद सावंत यांनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी आम्हाला कुणाचाही फोन आलेला नाही. फोन आल्याच्या बातम्या खोट्या आहेत. काही चढउतार होऊ द्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत, असे अरविंद सावंत म्हणाले. सकाळपासून बातम्या पसरवल्या जात आहे. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्यांच्यात एकमत नाही. विसंवाद आहे. सरकारमध्ये येऊनही रोज बातम्या येत आहे. त्यामुळे चर्चेचा विषय दुसरीकडे वळवण्यासाठी कुणी तरी पुडी सोडली आहे.

🔴ज्यांचे सरकारमध्ये गंभीर वाद सुरू आहे. त्यातून चर्चा दुसरीकडे वळवावी हा प्रयत्न केला जात आहे. जाणीवपूर्वक सकाळी 7 वाजल्यापासून बातम्या सोडल्या कोणी तरी. आमच्या कार्यालयाचं काल उद्घाटन झालं. आमचे सर्व खासदार उपस्थित होते. आजही सर्व उपस्थित आहे. आमची वज्रमूठ मजबूत आहे. टायगर जिंदा आहे. टप्प्प्याटप्प्याने त्यांच्यातीलच एक माणूस आमदार घेऊन भाजपकडे जाणार होता. पुन्हा आमच्या खासदार आणि त्यांच्या निष्ठेबद्दल मन कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा निषेध करतो. हे लोकं कठिण प्रसंगात राहिलेले हे खासदार आहेत. काही चढउतार होऊ द्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत, असे अरविंद सावंत म्हणाले.

🟥आम्हाला कुणाचाही फोन आलेला नाही. फोन आल्याच्या बातम्या खोट्या आहेत. १०० टक्के आम्ही कुठेच जाणार नाही. पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आहे कळू द्या. बांगलादेशात काल हिंदूंवर हल्ला झाला. अमेरिकेत जे काही घडलं,. आपल्या लोकांना बेड्या ठोकून देशात आणलं गेलं. इथे अमृतसरमध्ये अमेरिकेच्या मिलिट्रीचं विमान उतरतं हा देशाचा अपमान आहे. हे तिकडे डुबकी घेत आहेत. त्यांना हिंदुत्वाशी काही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. काल अमेरिकेने देशाचा अपमान केला आहे. छोट्या देशांनी अमेरिकेला डोळे वटारून सांगितलं. आमचे विमान येईल आणि आमचे लोक घेऊन जाईल. पण तुम्हाला का सांगता आलं नाही”, असेही अरविंद सावंत म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.