🟥मंगळवारी गणेश विसर्जन सोहळ्याला गालबोट.- राज्यात १४ जणांचा मृत्यू?
🟥दिवस उजाडताच ‘डी. जे’चा दणका! ( मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरु. – १८ तासांनी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल.)
मुंबई :- प्रतिनिधी.
मंगळवार सकाळपासून (ता. १७ सप्टेंबर) राज्यभरात गणपती विसर्जनाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरातील घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील लाडक्या बाप्पाला निरोप दिला दिला.
🟥दुसरीकडे मुंबई, पुणे, कोल्हापूरमधील गणपती विसर्जनाच्या मिरवणूका अद्याप सुरुच असून आज सकाळपासून पुन्हा डीजेचा दणदणाट सुरु झाला आहे. तसेच मुंबईतील लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूकही अद्याप सुरु असून लाखो गणेशभक्त लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
🔴मुंबई, पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरु….
मुंबईतील गणपती विसर्जनाच्या मिरवणुका अद्यापही सुरूच असून अनेक मानाचे गणपती विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहेत. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची गिरगाव चौपारटी परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मध्यरात्री मुंबईमध्ये पावसाच्या सरीही बरसल्या. मुसळधार पाऊस पडून देखील भक्तांचा उत्साह कायम आहे. गणेशभक्तांची गर्दी अन् बाप्पाच्या जयघोषाने मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये भक्तीमय वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
🛑१८ तासांनी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर
कालपासून मुंबईतील लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु असून विसर्जनासाठी लालबागचाच राजा चिंचपोकळीच्या चिंतामणी काही वेळातच गिरगाव चौपाटी परिसरात दाखल होतील. कार्यकर्त्यांच्या फौजेसह आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात लालबागच्या राजाचे आगमन होणार असून तब्बल १८ तासांनी बाप्पाचे विसर्जन होणार आहे. चिंचपोकळी, भायखळा नागपाडा, दोन टाकी, ऑपेरा हाऊस असा प्रवास करत बाप्पाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल होणार आहे.दुपारी एक वाजता आपल्या मंडपातून निघालेल्या लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर येता येता सकाळ उजाडली, राजाला चौपाटीवर येता येता तब्बल १८ तास लागले असले तरी भक्तांच्या उत्साहात तीळ मात्र ही कमतरता नव्हती, मध्यरात्री भर पावसात देखील भक्त बाप्पाची आतुरतेने वाट पाहत होते आणि जशी बाप्पांचं चौपाटीवर आगमन झालं तस भक्तांनी एकच जल्लोष केला. यावेळी अनंत अंबानी देखील लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
🛑पुण्यात डी.जेचा दणका…
दुसरीकडे, पुण्यातील सार्वजनिक मिरवणूक दुसऱ्या दिवशीही जल्लोषात सुरू आहे. काल संध्याकाळी मानाचे पाच गणपतींचे विसर्जन झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन ९ वाजता संपन्न झाले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. रात्री पारंपरिक वाद्य वाजवत काही मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला.
🟥ज्या गणेश मंडळांनी डी जे लावले होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळपासून पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. सकाळपासून पुन्हा अलका टॉकीज चौकात डी जे चा जोरदार दणदणाट पाहायला मिळत आहे. पोलिसांनी काल रात्री दिलेल्या माहितीनुसार ही विसर्जन मिरवणूक दुपारी १२ पर्यंत सुरू राहील.
🟥मंगळवारी गणेश विसर्जन सोहळ्याला गालबोट.- राज्यात १४ जणांचा मृत्यू?
( नाशिक, धुळे, अहमदनगर,अकोलामध्ये हळहळ )
मुंबई :- प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… अशा जयघोषात फुलांची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला राज्यभरात निरोप देण्यात अला. पुढच्या वर्षी लवकर , असे म्हणत जड अंतकरनाने गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. पण याच उत्सवाला राज्यात अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. राज्यभरात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.
🟥गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील ही घटना घडली.ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी दोघा मृत युवकांची नावं आहेत. दोघे जण मंगळवारी संध्याकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले असता नदीपात्रातील एका खड्ड्यात पडले. मात्र अग्निशमन दल तसच मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जनादरम्यान तीन जण वाहून गेले. पूर्णा नगर नदीपात्रात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये मयूर गजानन ठाकरे, अमोल विनायक ठाकरे यांचा समावेश आहे. दर्यापुर तालुक्यांतील दारापूर येथील गणपती विसर्जनादरम्यान राजेश संजय पवार हा २७ वर्षीय युवक पाण्यामध्ये बुडाला आहे. जिल्हा शोध बचाव पथक आज सकाळी पूर्णा नदीत पात्रात दाखल होणार असून शोध सुरू होणार आहे.
🛑गणपती विसर्जनादरम्यान दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. मंगळवारी सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव येथे ही घटना घडली. घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरून तलावात पडल्याने बुडून झाला मृत्यू झाला. अजिंक्य नवले (वय16) आणि केतन शिंदे (वय18) असे मयत युवकांची नावे आहेत. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर काढण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील मौजे चांदज येथे गणेश सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जनादरम्यान करपरा नदीमध्ये भागवत कल्याण अंभोरे (वय 13 वर्षे) मुलगा वाहून गेला.
🔴डीजेच्या आवाजामुळे एका 37 वर्षीय तरुणाचं मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर शहरात घडली. संदीप विश्वनाथ कदम (वय 37)असे या मयत तरुणाचे नाव आहे. तर शिवाजी कदम, शुभम कदम, गोविंद कदम हे तीन जण जखमी आहेत. धुळ्यातील चितोड येथे मंगळवारी गणपती मिरवणुकीवेळी ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला. मिरवणुकीत गाण्याच्या तालावर सर्व कार्यकर्ते नाचत होते. चालकाने ट्रॅक्टर अचानक सुरू केला. त्या ट्रॅक्टरखाली आल्याने तीन लहान बालकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे.
🟥इंदापूरात गणेश विसर्जनाला गेल्यावर घाटात एक जण बुडाला. इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपुर येथे ही दुर्देवी घटना घडली. अनिकेत कुलकर्णी असं या युवकाचं नाव आहे. निरा नरसिंहपुर येथील नीरा नदीच्या लक्ष्मी घाटावर तो गणेश विसर्जनासाठी गेला होता आणि त्याचवेळी ही घटना घडली त्याचा शोध घेतला जात आहे. अकोल्यात गणेश विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग येथील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनावेळी 18 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी गणेश हा आईसोबत घरगुती गणेशाचा विसर्जन करण्यासाठी म्हैसांग इथे पूर्णा नदीवर गेला होता. गणेश विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. तातडीने विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्याला नदीबाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.