Homeमुंबईराज्यात उष्णतेची लाट. - तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही.- नांदेडमध्ये उष्माघातामुळे तरुणाचा...

राज्यात उष्णतेची लाट. – तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही.- नांदेडमध्ये उष्माघातामुळे तरुणाचा मृत्यू.( राज्यामध्ये उष्णाघाताचे ७७ रुग्ण ) विविध सूचना व अधिक पहा.👇

राज्यात उष्णतेची लाट. – तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही.- नांदेडमध्ये उष्माघातामुळे तरुणाचा मृत्यू.
( राज्यामध्ये उष्णाघाताचे ७७ रुग्ण ) विविध सूचना व अधिक पहा.👇

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्यात पारा वेगाने वर चढत असून उष्णतेची लाट प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवार आणि मंगळवार हा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. यामध्येच उष्माघातामुळे नांदेडमध्ये ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर १ मार्चपासून ते आतापर्यंत राज्यामध्ये उष्णाघाताचे ७७ रुग्ण आढळले आहेत.
🟥अशातच राज्यात मंगळवारही सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. आज राज्यात कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये सर्वाधिक ४२अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. Accuweather या हवामानाबाबत माहिती देणाऱ्या वेबसाईटवर तापमानासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. Accuweather तापमानाची नोंद वेळेनुसार सतत बदलत असते. दुपरी 4 वाजता या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. Accuweather या वेबसाईटवर राज्यभरातील जिल्ह्यातील तापमानाच्या नोंदी उपलब्ध आहेत. यानुसार, मुंबई ३६ अंश सेल्सियस, नवी मुंबई ३५, ठाणे ३९, पुणे ३५, पिंपरी चिंचवड ३८, अहमदनगर ३७, सोलापूर ४०, अमरावती ३८ आणि नागपूर ३८ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
🟣तसेच मुंबई आणि उपनगरीय भागांबद्दल बोलायचं झालं तर, अंधेरी पूर्व ३८, अंधेरी पश्चिम ३८, भांडुप पूर्व ३७, भांडुप पश्चिम ३७ आणि भिवंडी येथे ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरात तीव्र उष्णेतची लाट पसरली आहे आणि पुढील काही दिवशी अशीच परिस्थिती राहू शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. अशातच जर तुम्ही दुपारी 1 ते 3 दरम्यान घराबाहेर पडणार असाल तर, स्वतःची काळजी घ्या. उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करा. तसेच तहान लागली नसेल, तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.