🛑महाराष्ट्र सर्वाधिक महसूल देणारे राज्य.- दस्त नोंदणीतून ५० हजार कोटी चे उत्पन्न.- एकूण २८,२६,१५० ५०,५००
🛑महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी.- मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा
मुंबई.- प्रतिनिधी.
🟣राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली. दस्तनोंदणीतून यंदा प्रथमच ५० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक उत्पन्न मिळणारे राज्य ठरले आहे.आर्थिक वर्षात २८ लाख २६ हजार १५० दस्तांची नोंदणी होऊन ५० हजार ५०० कोटींचा महसूल मिळाला.
🔴आर्थिक वर्षात ४५ हजार कोटी आणि त्यानंतर वाढीव ५० हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट राज्य सरकारने विभागाला दिले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यश आले. गुजरात आणि उत्तर प्रदेशला दस्तनोंदणीतून सुमारे २५ ते ३० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या उलट महाराष्ट्राला आतापर्यंत ४४ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
🅾️यंदा प्रथमच ५० हजार कोटींचा टप्पा पार करून नोंदणी विभागाने स्वत:च्या नावावर विक्रमी महसूल मिळविला. गतवर्षी (२०२२-२३) ४४ हजार ६८१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यामध्ये पाच हजार ८१९ कोटींची वाढ होऊन २०२३-२४ आर्थिक वर्षात ५० हजार ५०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तर दस्त संख्येत गतवर्षीपेक्षा यावर्षी दोन लाख १३ हजार ६५५ ने वाढ झाली आहे. वस्तू व सेवा करानंतर राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा क्रमांक लागतो.
🟥पुण्यातून २२.५० टक्के उत्पन्न
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून दस्तनोंदणीतून नऊ हजार १३० कोटींचे; तर ग्रामीण भागातून सुमारे दोन हजार १८७ कोटींचा महसूल मिळाला. त्यामुळे पुणे शहर व ग्रामीण भागातून मिळून एकूण ११ हजार ३१७ कोटींचा महसूल जमा झाला. यावरून राज्याला दस्तनोंदणीतून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी सुमारे २२.५० टक्के उत्पन्न एकट्या पुणे शहर व जिल्ह्यातून मिळाले आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर यापेक्षाही अधिक महसूल पुणे शहर व ग्रामीण भागातून मिळाला आहे.
🟣आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी शासनाने ५० हजार कोटींचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टापेक्षा पाचशे कोटींचा जास्त महसूल जमा झाला. रेडीरेकनरमध्ये कोणतीही वाढ न करता महसूल मिळाला आहे.
🅾️चालू आर्थिक वर्षाचा आढावा
🟥महिना दस्त संख्या महसूल (कोटीत)
एप्रिल २,२४,६७३ २,८७५.८०
मे २,२०,७३५ ३,४३९.६२
जून २,५१,६९९ ३,८०४.६९
जुलै २,२९,११७ ३,९२१.६३
ऑगस्ट २,३७,४६९ ४,०५६.४६
सप्टेंबर २,१०,२५६ ४,३७६.९६
ऑक्टोबर २,२६,०५६ ३,७९७.६१
नोव्हेंबर २,१२,१८९ ३,७३१.७८
डिसेंबर २,१०,००२ ३,९८२.२२
जानेवारी २,४७,९१२ ४,१५६.४७
फेब्रुवारी २,६७,५३० ४,४३५.९०
मार्च १,९१,६२६ ७,९२१
एकूण २८,२६,१५० ५०,५००
महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी.- मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा
मुंबई – प्रतिनिधी.
सध्या महाराष्ट्रातील अनेक राज्यात तापमानाचा पार वाढताना दिसत आहे. दुपारच्या वेळेत तर सूर्य आग ओकत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. याचपार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सावधतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे उष्माघातामुळे महाराष्ट्रात 23 जण बळी ठरले आहेत.
🟣दरम्यान मुंबईत दिवसाचे तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले असून आर्द्रतेचे प्रमाण 60 टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र, दिवसाच्या तुलनेत रात्रीची आर्द्रता जास्त असल्याची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (2 एप्रिल 2024) मुंबईतील आर्द्रतेचे प्रमाण रात्री 76 टक्के आणि दिवसा 62 टक्के नोंदवले गेले. हवामानतज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले की, दिवसा जास्त तापमान असल्याने आर्द्रता नसते आणि रात्रीच्या तुलनेत हवेतील आर्द्रता कमी असते. तर रात्रीच्या वेळी आर्द्रता वाढते. तुम्हाला जास्त थकल्यासारखे वाटते, खूप गरम वाटते आणि अस्वस्थ वाटते.
🅾️तर मुंबईत कमाल तापमान 32.9 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.8 अंश सेल्सिअस होते. 8 एप्रिलपर्यंत मुंबईत दिवसाचे तापमान 35 अंश तर रात्रीचे तापमान 24 अंश राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आहे. वाढत्या तापमानामुळे अनेकजण उष्माघाताचे बळी होतात.
🛑महिन्याभरात 23 जणांचा बळी
महाराष्ट्रात गेल्या 28 दिवसांत उष्माघाताने 23 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अमरावतीमध्ये सर्वाधिक 3, रायगड, पुणे, बीड, बुलढाणा आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे, अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड आणि सातारा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
🟥उष्माघाताची लक्षणे
चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी यांचा समावेश होतो. म्हणजे असामान्यपणे उच्च शरीराचे तापमान (104 अंशांपेक्षा जास्त). घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा उष्ण आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढतो, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, शरीर ताठ होते, हात-पायांमध्ये पेटके येतात, मानसिक बदल होतात, चिडचिड होते, गोंधळ होतो आणि कोमा म्हणजे बेशुद्धी येते आणि मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
🔴काय काळजी घ्यावी?
उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याची तीव्रता सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान सर्वाधिक असते, त्यामुळे तेथे चालणे, काम करणे किंवा खेळणे टाळा. जर बाहेर जाणे आवश्यक असेल सोबत अत्यावश्यक गोष्टी असणं गरजेचे आहे. शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नका. उशिरा कमांची विभाग सकाळी किंवा संध्याकाळी करा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा हलक्या रंगाचे आणि सैल कपडे वापरा. घट्ट जीन्स आणि चमकदार कपडे घालणे टाळा. टोपी, स्कार्फ बांधा आणि छत्री वापरा. तापमान वाढले की पाणी पिण्याचे प्रमाण देखील वाढवा. थकवा जाणवू न देता दररोज 8 ते 10 ग्लासांपेक्षा जास्त पाणी प्या. तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी, ORS यांचे सेवन जास्तीत जास्त करा. जास्त साखर किंवा अल्कोहोल सामग्री असलेले पेय पिणे टाळा. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. तसेच बाहेरील थंड पेय पिणे टाळावे.