Homeकोंकण - ठाणेएकाच कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या. - धक्कादायक कारण आलं समोर..पहा 👇

एकाच कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या. – धक्कादायक कारण आलं समोर..पहा 👇

एकाच कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या. –
धक्कादायक कारण आलं समोर..पहा 👇

पुणे :- प्रतिनिधी.

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी नदीमध्ये उडी घेऊन सामूहिक आत्महत्या केली. ही घटना 17 जानेवारी रोजी घडली असून याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या रागातून बदनामीच्या भीतीने कुटुंबाने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. आज मंगळवारी, 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोहन उत्तम पवार (वय – 50), संगीता मोहन पवार (वय – 45, दोघे रा. खामगाव, ता.गेवराई), त्यांचे जावई श्यामराव पंडित फुलवरे (वय – 32), त्यांची पत्नी राणी श्यामराव फुलवरे (वय – 27), श्यामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश श्यामराव फुलवरे (वय – 7), छोटू श्यामराव फुलवरे (वय – 5) आणि कृष्णा (वय – 3) अशी मृतांची नावे आहेत.

पुणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पवार हे मुळचे बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. मोहन पवार हे निघोज गावात पालावर राहत असताना त्यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय – 20) याने त्यांच्याच समाजातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला 17 जानेवारी रोजी लग्नाकरिता पळवून नेले होते.
मुलाने महिलेला पळवून नेल्याचे समजताच मोहन पवार यांनी त्यांच्यापासून पुण्यात विभक्त राहत असलेला मोठा मुलगा राहुल पवार यास फोन करून माहिती दिली. तुझ्या छोट्या भावाने वडार समाजाची मुलगी पळवून नेली आहे. त्यामुळे ती परत आणण्यास त्याला सांग, अन्यथा आम्ही विष घेऊन कुटुंबासह आत्महत्या करू. त्यानंतर त्या दिवशी रात्री मोहन पवार हे त्यांच्या पालासह कुटुंबास घेऊन समाजात बदनामी होईल या भीतीने दुसरीकडे निघून गेले. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता.
पोलिसांना 18 ते 22 जानेवारी दरम्यान भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील चार मृतदेह मिळून आले होते. घातपाताचा संशय व्यक्त केला जाऊ लागल्याने पोलिसांनी एनडीआरएफ पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू केल्यावर मंगळवारी आणखी तीन मृतदेह बचावकार्य पथकास नदीपात्रात सापडले. घटनेची माहिती मिळताच, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. याबाबत यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.