Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रबारा वर्षात फाईव्ह स्टार एमआयडीसीत नवीनएकही उद्योग आले नाहीत.- समरजीतसिंह घाटगे (...

बारा वर्षात फाईव्ह स्टार एमआयडीसीत नवीनएकही उद्योग आले नाहीत.- समरजीतसिंह घाटगे ( बाळेघोल येथे जाहीर सभा संपन्न.)

बारा वर्षात फाईव्ह स्टार एमआयडीसीत नवीन
एकही उद्योग आले नाहीत.- समरजीतसिंह घाटगे ( बाळेघोल येथे जाहीर सभा संपन्न.)

सेनापती कापशी/ प्रतिनिधी.

पालकमंत्री यांनी पंचवीस वर्षे आमदार, बाबीस वर्षे मंत्री आहेत. एवढी वर्षे सत्ता असताना त्यांनी मतदारसंघात उद्योगधंदे आणले पाहिजे होते. पण कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीत गेल्या बारा वर्षात एकही मोठा उद्योग आणला नाही. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले. बाळेघोल (ता.कागल) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,” ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब यांनी पालकमंत्र्यांना युवकांचे भवितव्य घडविण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सर्वाधिक सत्ता दिली. मात्र त्यांनी युवकांना बेरोजगार व व्यसनाधीन करून एक पिढी बरबाद केली. सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणणाऱ्या मुश्रीफांनी महिला सक्षमीकरण, शाळा व आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आणला याचा महिलांनी विचार करावा.”
पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर म्हणाले,” स्वतःच्या स्वार्थासाठी समाजास वेठीस धरण्याचे काम सुरू आहे.
भय आणि भ्रष्टाचार मुक्त समाज जीवनासाठी तुतारी वाजवायला पाहिजे तुतारी चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्याची गरज आहे.‌
विद्यमानाकडून तुमच्या स्वातंत्र्याला लोकशाहीला धक्का दिला जात आहे. या निवडणुकीत विद्यमान घड्याळ चिन्हाचे उमेदवार तुम्हाला चंद्र आणि सूर्य सोडून सर्व काही देतील. पण त्यांच्या आमिषाला बळी न पडता लोकशाहीचा खरा हिसका त्यांना दाखवूया.”
शिवाजीराव कांबळे म्हणाले, ” ईडीच्या भितीने पालकमंत्री हसन मुश्रीफांनी पुरोगामीत्वाला तिलांजली दिली आहे.”

स्वागत व प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले. सभेस शिवाजी कांबळे, मनजीत बेनाडीकर,दयानंद पाटील नंद्याळकर, चित्रा गुरव, मोहन मोरे,संजय बरकाळे उपस्थित होते.‌ आभार दिनकर गुरव यांनी मानले.‌

चौकट-
जनता कंटाळल्याने परिवर्तन अटळ गेल्या पंचवीस वर्षांत होत असलेली हुकुमशाहीला जनता कंटाळल्याने गावागावात परिवर्तनाचे वारे आहे. जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याने या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. नामदारांनी माणसांच्या विचारधारेला तिलांजली दिली. अशा नेतृत्वाला बदलण्याची वेळ आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.