🟥निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा.- न्यायालयाचे आदेश.- खंडणी प्रकरण काय? पहा.
🛑महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार? –
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश एका विशेष उच्च न्यायालयाने दिले आहेत. बंगळुरूतील न्यायालयाने शुक्रवारी (२७ सप्टेंबर) हे आदेश पोलिसांना दिले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दोन उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप एका संस्थेने केला आहे.
🔴निर्मला सीतारामन यांच्यावर कुणी केला आहे आरोप?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोट्यवधी रुपयांची खंडणी उद्योजकांकडून घेतली, असे याचिकेत म्हटले आहे. जनाधिकार संघर्ष परिषद (JSP) या संस्थेचे आदर्श अय्यर यांनी बंगळुरूतील न्यायालयाकडे निर्मला सीतारामन यांच्या विरोधात गुन्हा करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.
🟥या प्रकरणावर सुनावणी करताना बंगळुरुतील विशेष न्यायालयाने निर्मला सीतारामन आणि या प्रकरणातील इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. बंगळुरूतील तिलकनगर पोलीस ठाणे पोलिसांना हे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
🛑सीतारामन यांच्यासह भाजपा नेत्यांवर खंडणीचे आरोप
माहितीनुसार, जनाधिकार संघर्ष परिषदेचे आदर्श अय्यर यांनी एप्रिल २०२४ मध्ये कोर्टात याचिका दाखल केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, ईडी अधिकारी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपाचे राष्ट्रीय नेते, तत्कालिन भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, बीवाय विजयेंद्र यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
🔴सीतारामन यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी एप्रिल २०१९ पासून ऑगस्ट २०२२ पर्यंत उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या फर्मीकडून २३० कोटी रुपये आणि अरबिंदो फार्मसीकडून ४९ कोटी रुपये इलेक्ट्रोल बाँड म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्यात आली, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
🟥सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे निवडणूक रोखे योजना.
निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवत रद्द केली आहे. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी सुरू करण्यात आलेली निवडणूक रोखे योजना तत्काळ बंद केली होती. ही योजना माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. बाँडबद्दल गोपनियता ठेवणे घटनाबाह्य आहे, असे कोर्टाने म्हटले होते. न्यायालयाने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला, हे जाहीर करण्याचे आदेश दिले होते. ही आकडेवारी एसबीआय बँकेकडून मिळाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली होती.
🛑महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार? – केंद्रीय निवडणुक आयोगाचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली माहिती
मुंबई :- प्रतिनिधी.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकांविषयी भाष्य केले. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी आयोगाने गेल्या दोन दिवसांपासून ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. या चर्चेत सण उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, आठवड्याच्या मध्यामध्ये म्हणजे शनिवार, रविवार सोडून मतदान घ्यावे, असे राजकीय पक्षांनी म्हटले. फेक न्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात, त्यावर नियंत्रणाची मागणी राजकीय पक्षांनी केली, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या सर्व गोष्टींवर आयोगाने विचार केला आहे. निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करु, असे निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले.
🛑26 नोव्हेंबर रोजी विधान सभेचा कार्यकाळ संपणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 9. 59 कोटी मतदार असून पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 19.48 लाख आहे. महाराष्ट्रत एकूण 1,00,186 पोलिंग बूथ असून यात अर्बन बूथची संख्या 42,585 तर रूरल पोलिंग बूथची संख्या 57,601 इतकी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र दौरा केला. यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने जवळपास 14 राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली. यात दिवाळी आणि इतर उत्सवाला लक्षात घेता निवडणूक जाहीर करण्यात यावी अशी नेत्यांची भूमिका होती. तसेच मतदारांसाठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पक्षांकडून करण्यात आली.
🔴राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.
🟥शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणीं तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. 350 असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान क्षेत्र असेलल्या कुलाबा, कल्याण, कुर्ला, मुंबादेवी इथ मतदान कमी झालं आहे. गडचिरोली येथे 73 टक्के मतदान झालं, मग कुलाबा कल्याण येथे मतदानाचा टक्का वाढायला हवा. इथल्या मतदारांनी विचार करायला हवा,असेही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
🔴निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अँप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल,असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री 6 ते सकाळीं 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाईल.